अ‍ॅपशहर

World Cup विजेत्यांचा पाच कोटींचे बक्षिस अन् सचिन तेंडुलकरने सांगितली मोलाची गोष्ट, म्हणाला...

U19 T20 World Cup Winner by Bcci : भारताने १९ वर्षांखालील महिला विश्वचषक जिंकला. या संघाचा सन्मान यावेळी BCCI कडून करण्यात आला. या संघाला पाच कोटी रुपयांचे बक्षिस देण्यात आले. त्यावेळी भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने या युवा खेळाडूंना एक मोलाची गोष्ट सांगितली. सचिनने यावेळी कोणती गोष्ट सांगितली जाणून घ्या...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 1 Feb 2023, 7:47 pm
अहमदाबाद : भारताने महिलांच्या युवा (१९वर्षांखालील) विश्वचषकाला गवसणी घातली होती. या विश्वविजेत्यांचा सन्मान करण्यासाठी भारताचा माजी महान खेळाडू सचिन तेंडुलकरला बोलवण्यात आले होते. या विश्वविजेत्यांचा सन्मान करताना सचिनने एक अभिमानाची गोष्ट सांगितली आणि सचिनचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम U19 Womens World Cup Winner Team
सौजन्य-बीसीसीआय

सचिन यावेळी विश्वविजेत्यांचा सन्मान करताना म्हणाला की, " तुम्ही हा विश्वचषक जिंकला. या विश्वविजयासह तुम्ही भारतातील मुलींना एक स्वप्न दाखवले आहे. त्यामुळे आता बऱ्याच मुली या क्रिकेटकडे वळू शकतील. या विश्वविजयामुळे महिलांच्या आयपीएलची धडाक्यात सुरुवात होईल आणि भारतीय क्रिकेटसाठी ही फार मोठी गोष्ट ठरणार आहे. पुरुष आणि महिला यांना समान अधिकार असायला हवेत, असे मला वाटते. पण हे फक्त स्पोर्ट्समध्ये नसावे तर सर्वच क्षेत्रांमध्ये असावे. माझ्यामतेया विश्वविजयाने महिला क्रिकेटमध्ये मोठा बदल होईल आणि त्याचा फायदा नक्कीच क्रिकेटला होईल."

रविवारी महिलांच्या १९ वर्षांखालील विश्वचषकाची अंतिम फेरी खेळवण्यात आली होती. या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने मोठा विजय साकारला आणि विश्वचषकावर भारताचे नाव कोरले. आतापर्यंत भारताच्या महिलांना एकही आयसीसीची स्पर्धा जिंकता आली नव्हती. पण शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास रचला आणि आयसीसीची पहिली स्पर्धा जिंकण्याचा मान पटकावला. भारताने २००७ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर थेट आत्ता भारताला टी-२० विश्वचषक जिंकता आला आहे.

भारताने विश्वचषक जिंकला आणि बीसीसीआयने त्यांच्यासाठी मोठे बक्षिस जाहीर केले. बीसीसीआयचे सचिव यांनी या विश्वविजेत्या संघाला पाच कोटी रुपयांचे बक्षिस बीसीसीआय देणार असल्याचे जाहीर केले होते. यावेळी हा पाच कोटी रुपयांचा धनादेश विश्वविजेत्या संघाची कर्णधार शेफाली वर्माला सुपूर्द करण्यात आला. त्यावेळी सचिनने या विश्वविजेत्या संघाला मार्गगर्शन केले आणि त्यांच्यासाठी प्रेरणादायी भाषणंही केले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना खेळवण्यापूर्वी हा सोहळा अहमदाबादच्या मैदानात पार पडला. यावेळी बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिन जय शहा आणि कोषाध्यक्ष आशीष शेलार उपस्थित होते.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख