अ‍ॅपशहर

रोहित शर्माचा तो एकमेव निर्णय भारताला विजय मिळवून देणार, पाहा नेमकं काय केलं होतं...

Rohit Sharma : रोहित शर्माने जेव्हा हा निर्णय घेतला होता तेव्हा त्याच्यावर भरपूर टीका झाली होती. पण त्याचा हा एकमेव निर्णय आता भारतीय संघाला विजय मिळवून देऊ शकतो असे आता दिसत आहे.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 10 Jun 2023, 5:02 pm
लंडन : भारतीय संघाने तिसरा दिवस गाजवला होता आणि त्यामुळे त्यांच्यासाठी विजयाची आशा निर्माण झाली होती. त्यामध्येच सामन्याच्या चौथ्या दिवशी रोहित शर्माचा एक निर्णय किती योग्य होता हे पाहायला मिळाले. कारण रोहित शर्माच्या या एका निर्णयामुळे भारताला विजय मिळू शकतो, असे चित्र पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Rohit Sharma
सौजन्य-ट्विटर


रोहित शर्माने जेव्हा संघ निवडला तेव्हा त्याच्यावर जोरदार टीका झाली होती. कारण रोहितने टॉस जिंकल्यावर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा. पण त्यानंतर त्याने जेव्हा संघ निवडला तेव्हा त्याच्यावर जोरदार टीका झाली. कारण रोहित शर्माने यावेळी भारताचा अव्वल गोलंदाज आर. अश्विनला संघाबाहेर काढले होते. अश्विन हा कोणत्याही खेळपट्टीवर विकेट मिळवून देणारा गोलंदाज आहे. त्याचबरोबर तो उपयुक्त फलंदाजीही करू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर शतकंही आहेत. पण रोहितने त्याला वगळले आणि उमेश यादवला यावेळी संधी दिली. त्यावेळी रोहितवर जोरदार टीका झाली होती. पहिल्या डावात तर उमेशला एकही बळी मिळवता आला नाही आणि त्यानंतर रोहितने उमेशला का संधी दिली यावर जोरदार चर्चा व्हायला सुरुवात झाली. पण उमेश यादवने यावेळी सामन्याच्या चौथ्या दिवशी अशी काही कामगिरी केली की, त्यामुळे भारतीय संघाला आता विजयाची संधी निर्माण झाली आहे.

भारताच्या विजयाच्या मार्गात सर्वात मोठा अडसर होता तो मार्नस लाबुशेन. कारण सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी त्याला बाद करण्यासाठी जीवाचे रान केले होते. मोहम्मद सिराजने तर त्याला चागंलेच सातवले होते. मार्नसने अंगावर दुखापती झेलल्या पण त्याने विकेट मात्र दिली नाही. त्यामुळे सामन्याच्या चौथ्या दिवशी तोच भारताच्या विजयाच्या मार्गात मोठा अडसर होता. कारण मोठी खेळी साकरण्यात त्याचा हातखंडा आहे. पण उमेशने मात्र दिवसाच्या तिसऱ्याच षटकात त्याला बाद केले आणि भारतीय संघाला मोठे यश मिळवून दिले. त्यामुळे उमेशला खेळवण्याचा निर्णय योग्य असल्याचे पाहायला मिळाले असून त्यामुळे आता भारतीय संघाला विजय मिळवता येऊ शकतो.

रोहितने उमेशला खेळवलं म्हणून त्याच्यावर टीका झाली खरी, पण मोक्याच्या क्षणी उमेश भारताच्या मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळाले.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख