अ‍ॅपशहर

IND vs AUS 1st T20: भारताच्या पराभवाचं एकमेव कारण, २०८ धावा करूनही का झाला लाजीरवाणा पराभव जाणून घ्या...

IND vs AUS : भारताच्या फलंदाजांनी कमाल केली आणि २०८ धावा केल्या. पण तरीही भारताला लाजीरवाणा पराभव का पत्करावा लागला,याचे एकमेव कारण आता समोर आले आहे. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी घोर निराशा केली आणि त्यामुळेच सामना भारताच्या हातून निसटला. या लढतीत भराताकडून कोणत्या चुका झाल्या आणि पराभवाचे एकमेव कारण काय, जाणून घ्या....

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 21 Sep 2022, 11:22 am
मोहाली : भारताने धडाकेबाज फटकेबाजी केली. लोकेश राहुल आणि हार्दिक पंड्या यांनी अर्धशतक साकारली. भारताने २०८ धावांचा डोंगर रचला. पण तरीही भारताला या सामन्यात लाजीरवाणा पराभव का पत्करावा लागला, याचे एकमेव कारण आता समोर आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Ind vs Aus
सौजन्य-ट्विटर


भारताने या सामन्यात गोलंदाजी लौकिकाला साजेशी केली नसली तरी भारताला विजयासाठी बऱ्याच संधी मिळाल्या होत्या. पण या संधी भारतीय संघाने दवडल्या. भारतीय यावेळी तीन संधी मिळाल्या होत्या, पण तीनपैकी एकाही संधीचे सोने भारतीय खेळाडूंना करता आले नाही आणि ही एकमेव गोष्ट भारताच्या पराभवाची कारम ठरली.

भारताने या सामन्यात एक नाही तर तब्बल तीन झेल सोडल्याचे पाहायला मिळाले. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर आरोन फिंच बाद झाल्यावर कॅमेरून ग्रीन आणि स्टीव्हन स्मिथ यांनी संघाचा डाव सावरला. पण यामध्ये मोठा भाग भारताच्या खेळाडूंनी सोडलेल्या कॅचेसचा होता. कारण या दोघांच्याही कॅचेस यावेळी भारतीय खेळाडूंनी सोडल्या आणि त्यांना जीवदान दिले. आठवे षटक यावेळी हार्दिक पंड्या टाकत होता. हार्दिकच्या या आठव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ग्रीन बाद होऊ शकला असता. कारण तिसऱ्या चेंडूवर ग्रीनचा झेल उडाला होता आणि हा झेल अक्षर पटेलने सोडला. त्यामुळे ग्रीनला यावेळी ४२ धावांवर जीवदान मिळाले.

अक्षर पटेलच्या त्यानंतरच्या नवव्या षटकात स्टीव्हन स्मिथला जीवदान मिळाले. या नवव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर लोकेश राहुलने स्मिथचा झेल सोडला आणि त्याला जीवदान दिले. त्यावेळी स्मिथ हा १९ धावांवर होता. त्यानंतर स्मिथने दमदार फलंदाजी केली आणि धावगती वाढवली. त्यानंतर ही गोष्ट घडली ती १८व्या षटकात. हे षटक भारताचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल टाकत होता. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर हर्षलकडून आपल्या गोलंदाजीवरच ही चूक घडल्याचे पाहायला मिळाले. हर्षलने हा दुसरा चेंडू चांगला टाकला होता, या चेंडूचा समर्थपणे सामना वेडला करता आला नाही. त्यामुळे हा चेंडू मारताना तो चकला आणि त्याचा झेल उडाला. हा झेल थेट हर्षलजवळ आला. हर्षल आता हा झेल पकडेल आणि वेड बाद होईल, असे वाटत होते. पण हा झेल हर्षलच्या हातून सुटला आणि वेडला जीवदान मिळाले. यावेळी वेड हा २३ धावांवर होता. त्यानंतर धडाकेबाज फटकेबाजी करत वेडने नाबाद ४५ धावांची खेळी साकारली आणि सामना ऑस्ट्रेलियाला जिंकवून दिला.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख