बंगळुरु : भारत आणि बंगळुरु यांच्यामध्ये आज पाचवा आणि निर्णायक सामना होणार आहे. हा सामना जो संघ जिंकेल त्यांना मालिका विजय साकारता येणार आहे. त्यामुळे या महत्वाच्या सामन्यात भारतीय संघात तीन मोठे बदल करण्यात येणार असल्याचे दिसत आहे.
पहिला बदल
आतापर्यंतच्या चारही ट्वेन्टी२- सामन्यांमध्ये श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली होती. पण या चारपैकी एकही सामन्यात श्रेयसला चांगली कामगिरी करून आपली छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे आता पाचव्या आणि निर्णायक सामन्यासाठी भारतीय संघातून श्रेयसला डच्चू दिला जाऊ शकतो. श्रेयसच्या जागी भारतीय संघात अष्टपैलू दीपक हुडाचा समावेश केला जाऊ शकतो. दीपकचा संघात समावेश केल्यावर भारताला एक धडाकेबाज फलंदाज आणि चांगला फिरकीपटू मिळू शकतो. दीपक संघात आला तर भारतीय संघ अजून मजबूत होऊ शकतो. त्यामुळे हा महत्वाचा बदल भारतीय संघात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दुसरा बदल
चारही सामन्यांमध्ये भारतीय संघ दोन फिरकीपटूंसह उतरला होता. यामध्ये युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांचा समावेश होता. चहल सातत्यपूर्ण दमदार कामगिरी करत आहे. पण त्याला अपेक्षित साथ अक्षर पटेलकडून मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता चौथ्या सामन्यात अक्षरला संघाबाहेर केले जाऊ शकते. अक्षरच्या जागी संघात आता मिस्ट्री स्पिनर रवी बिश्नोईचा समावेश करण्यात येऊ शकतो. रवीची गोलंदाजी आतापर्यंत बऱ्याच फलंदाजांन समजलेली नाही. त्यामुळे तो भारतासाठी नक्कीच उपयोगी ठरू शकतो. त्यामुळे हा दुसरा बदल आता भारताच्या संघात होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
तिसरा बदलभारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजांसह आतापर्यंत चारही सामन्यांमध्ये मैदानात उतरला आहे. पण वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली दिसत नाही. त्यामुळे पाचव्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय संघ आयपीएल गाजवणाऱ्या उमरान मलिकला संधी देऊ शकतो. कारण उमरानने आयपीएलमध्ये वेगवान मारा करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान कधी मिळते, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. त्यामुळे पाचव्या सामन्यात उमरान मलिकच्या रुपात भारतीय संघ सर्वांनाच सरप्राईज देऊ शकतो.
पहिला बदल
आतापर्यंतच्या चारही ट्वेन्टी२- सामन्यांमध्ये श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली होती. पण या चारपैकी एकही सामन्यात श्रेयसला चांगली कामगिरी करून आपली छाप पाडता आलेली नाही. त्यामुळे आता पाचव्या आणि निर्णायक सामन्यासाठी भारतीय संघातून श्रेयसला डच्चू दिला जाऊ शकतो. श्रेयसच्या जागी भारतीय संघात अष्टपैलू दीपक हुडाचा समावेश केला जाऊ शकतो. दीपकचा संघात समावेश केल्यावर भारताला एक धडाकेबाज फलंदाज आणि चांगला फिरकीपटू मिळू शकतो. दीपक संघात आला तर भारतीय संघ अजून मजबूत होऊ शकतो. त्यामुळे हा महत्वाचा बदल भारतीय संघात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दुसरा बदल
चारही सामन्यांमध्ये भारतीय संघ दोन फिरकीपटूंसह उतरला होता. यामध्ये युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांचा समावेश होता. चहल सातत्यपूर्ण दमदार कामगिरी करत आहे. पण त्याला अपेक्षित साथ अक्षर पटेलकडून मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता चौथ्या सामन्यात अक्षरला संघाबाहेर केले जाऊ शकते. अक्षरच्या जागी संघात आता मिस्ट्री स्पिनर रवी बिश्नोईचा समावेश करण्यात येऊ शकतो. रवीची गोलंदाजी आतापर्यंत बऱ्याच फलंदाजांन समजलेली नाही. त्यामुळे तो भारतासाठी नक्कीच उपयोगी ठरू शकतो. त्यामुळे हा दुसरा बदल आता भारताच्या संघात होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.
तिसरा बदलभारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजांसह आतापर्यंत चारही सामन्यांमध्ये मैदानात उतरला आहे. पण वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली दिसत नाही. त्यामुळे पाचव्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय संघ आयपीएल गाजवणाऱ्या उमरान मलिकला संधी देऊ शकतो. कारण उमरानने आयपीएलमध्ये वेगवान मारा करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्यामुळे त्याला भारतीय संघात स्थान कधी मिळते, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. त्यामुळे पाचव्या सामन्यात उमरान मलिकच्या रुपात भारतीय संघ सर्वांनाच सरप्राईज देऊ शकतो.