अ‍ॅपशहर

U-19 World Cup : वर्ल्डकप जिंकण्यासाठी BCCIने घेतला मोठा निर्णय; ५ खेळाडू जाणार या देशात

U-19 World Cup :भारतीय संघ १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या ब गटात आहे आणि संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले आहे.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 21 Jan 2022, 4:16 pm
मुंबई : भारताचा १९ वर्षांखालील संघ (India U-19) सध्या वेस्ट इंडिजमध्ये विश्वचषक स्पर्धेत (U-19 World Cup) खेळत आहे. या स्पर्धेतही भारतीय संघाची विजयी घोडदौड कायम आहे, पण विजयाचा जल्लोष सुरू असताना कोरोनानेही भारतीय संघात एन्ट्री केली आहे. आयर्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारताचे ६ खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे या सामन्यात भारतीय संघाला प्लेइंग इलेव्हन बनवताना खूप अडचणींचा सामना करावा लागला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम u19 world cup bcci to send five reserve players after covid positive cases in indian camp
U-19 World Cup : वर्ल्डकप जिंकण्यासाठी BCCIने घेतला मोठा निर्णय; ५ खेळाडू जाणार या देशात


वाचा- हा गोलंदाज ठरतोय मोठी डोकेदुखी; सुनील गावस्करांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न

भारतीय संघ १७ खेळाडूंच्या टीमसह वेस्ट इंडिजला दाखल झाला. आता त्यापैकी ६ खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने फक्त ११ खेळाडूच शिल्लक राहिले. आयर्लंडविरुद्ध भारत याच ११ खेळाडूंसह मैदानात उतरला, पण पुढील सामन्यांमध्ये अडचणी वाढू नयेत, म्हणून बीसीसीआयने स्पर्धेपूर्वी निवडलेल्या ५ राखीव खेळाडूंना वेस्ट इंडिजला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

वाचा- भारताला सापडला 'मिस्ट्री स्पिनर'; चेंडू असा काही वळवला की ICC देखील हैराण झाले



वाचा- टी-२० वर्ल्डकप २०२२: टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर पाहा, पहिली लढत पाकविरुद्ध

भारताने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात कोरोनाचा फटका बसूनही टीम इंडियाने आयर्लंडचा १७४ धावांनी पराभव केला. भारताला ग्रुप स्टेजवर तिसरा सामना युगांडाविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यातही भारत आयर्लंडविरुद्ध खेळलेल्या ११ खेळाडूंसह मैदानात उतरणार आहे.

वाचा- दुसऱ्या वनडे भारताने घेतला महत्त्वाचा निर्णय; अशी आहे टीम इंडिया

५ राखीव खेळाडू वेस्ट इंडिजकडे होणार रवाना
ग्रुप स्टेजनंतर बाद फेरीचे सामने सुरू होतील. अशा परिस्थितीत, कोरोनाच्या घुसखोरीमुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढू नयेत, हे लक्षात घेत बीसीसीआयने ५ राखीव खेळाडूंना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. उध्यम सहारन, यष्टिरक्षक फलंदाज अभिषेक पोरेल, रिशिथ रेड्डी, अंश गोसाई आणि पी.एम. सिंह राठोड हे ५ खेळाडू वेस्ट इंडिजला जाणार आहेत.

महत्वाचे लेख