कूलिज (एंटीगा) : आयसीसी १९ वर्षाखालील वर्ल्डकपमधील दुसऱ्या सुपर लीग सेमीफायनलमध्य आज भारताची लढत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत एकही लढत गमावली नाही. संघातील अनेक खेळाडूंना करोना झाल्यानंतर देखील टीम इंडियाच्या कामगिरीवर परिणाम झाला नाही. या उलट ऑस्ट्रेलियाचा साखळी फेरीतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. भारताने क्वार्टर फायनलमध्ये बांगलादेशचा तर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला होता.
वाचा- आज ब्लॉकबस्टर सेमीफायनल; विक्रमी ५व्या विजेतेपदापासून भारत दोन...
सीनिअर क्रिकेटमध्ये जेथे ऑस्ट्रेलिया सर्व संघांवर भारी पडते. पण ज्युनिअर क्रिकेटमध्ये परिस्थितीत उटल आहे. १९ वर्षाखालील वर्ल्डकप भारत आणि ऑस्ट्रेलियात ७ लढती झाल्या आहेत. त्यापैकी पाचमध्ये भारताचा विजय झालाय. १९९८ साली ऑस्ट्रेलियाने भारताचा या स्पर्धेत अखेरचा पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या ५ लढतीत भारताचा विजय झालाय. श्रीलंकेत २००० साली झालेल्या स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियावर १७० धावांनी तर २०१२ च्या स्पर्धेत फायनलमध्ये भारताने उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली ६ विकेटनी विजय मिळवला होता. २०१८ साली या दोन्ही संघात दोन वेळा लढत झाली होती. एकदा साखळी फेरीत आणि फायनलमध्ये, या दोन्ही वेळी भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. साखळी फेरीत १०० धावांनी तर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दिलेले २१७ धावांचे लक्ष्य मनजोत कालराच्या १०१ धावांच्या जोरावर सहज पार केले. २०२० मध्ये क्वार्टर फायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता. या वर्ल्डपकमध्ये मुख्य स्पर्धा सुरू होण्याआधी भारताने सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता.
वाचा- भारताने चीनचा धुव्वा उडवला; पाहा ड्रॅगनची कशी दाणादाण उडाली
भारतीय संघाने गेल्या तीन १९ वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेतील फायनल खेळली आहे. आता भारताला सलग चौथी फायनल खेळण्याची संधी आहे. या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ देखील भारतच आहे, टीम इंडियाने सर्वाधिक चार वेळा विजेतेपद मिळवले आहे. फायनलमध्ये भारताचा ३ वेळा पराभव झालाय. तर सेमीफायनलमध्ये २००४ साली भारताचा अखेरचा पराभव झाला होता. तेव्हा पाकिस्तानकडून टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेचे ३ वेळा विजेतेपद मिळवले आहे.
वाचा- IPL लिलावाच्या यादीत समावेश झाला अन् खेळाडू म्हणाला, कृपया माझ्यासाठी...
वाचा- आज ब्लॉकबस्टर सेमीफायनल; विक्रमी ५व्या विजेतेपदापासून भारत दोन...
सीनिअर क्रिकेटमध्ये जेथे ऑस्ट्रेलिया सर्व संघांवर भारी पडते. पण ज्युनिअर क्रिकेटमध्ये परिस्थितीत उटल आहे. १९ वर्षाखालील वर्ल्डकप भारत आणि ऑस्ट्रेलियात ७ लढती झाल्या आहेत. त्यापैकी पाचमध्ये भारताचा विजय झालाय. १९९८ साली ऑस्ट्रेलियाने भारताचा या स्पर्धेत अखेरचा पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या ५ लढतीत भारताचा विजय झालाय. श्रीलंकेत २००० साली झालेल्या स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियावर १७० धावांनी तर २०१२ च्या स्पर्धेत फायनलमध्ये भारताने उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली ६ विकेटनी विजय मिळवला होता. २०१८ साली या दोन्ही संघात दोन वेळा लढत झाली होती. एकदा साखळी फेरीत आणि फायनलमध्ये, या दोन्ही वेळी भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. साखळी फेरीत १०० धावांनी तर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने दिलेले २१७ धावांचे लक्ष्य मनजोत कालराच्या १०१ धावांच्या जोरावर सहज पार केले. २०२० मध्ये क्वार्टर फायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता. या वर्ल्डपकमध्ये मुख्य स्पर्धा सुरू होण्याआधी भारताने सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता.
वाचा- भारताने चीनचा धुव्वा उडवला; पाहा ड्रॅगनची कशी दाणादाण उडाली
भारतीय संघाने गेल्या तीन १९ वर्षाखालील वर्ल्डकप स्पर्धेतील फायनल खेळली आहे. आता भारताला सलग चौथी फायनल खेळण्याची संधी आहे. या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ देखील भारतच आहे, टीम इंडियाने सर्वाधिक चार वेळा विजेतेपद मिळवले आहे. फायनलमध्ये भारताचा ३ वेळा पराभव झालाय. तर सेमीफायनलमध्ये २००४ साली भारताचा अखेरचा पराभव झाला होता. तेव्हा पाकिस्तानकडून टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. ऑस्ट्रेलियाने या स्पर्धेचे ३ वेळा विजेतेपद मिळवले आहे.
वाचा- IPL लिलावाच्या यादीत समावेश झाला अन् खेळाडू म्हणाला, कृपया माझ्यासाठी...