अ‍ॅपशहर

शाळेत गणितात नापास होत असे विराट!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली बॅटने धावांचा डोंगर रचतो. सध्या तो जगातला सर्वोत्तम फलंदाज आहे. पण त्याला आजही एका गोष्टीचं दु:ख आहे, ते म्हणजे शाळेत असताना त्याचं गणित कच्चं होतं! तो गणितात नापास व्हायचा.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Sep 2019, 9:20 pm
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम virat

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली बॅटने धावांचा डोंगर रचतो. सध्या तो जगातला सर्वोत्तम फलंदाज आहे. पण त्याला आजही एका गोष्टीचं दु:ख आहे, ते म्हणजे शाळेत असताना त्याचं गणित कच्चं होतं! तो गणितात नापास व्हायचा.

एका चॅट शोदरम्यान विराटने आपल्या मनातला हा सल बोलून दाखवला. शालेय जीवनात गणितात नापास होण्याचं मला आजही वाईट वाटतं, असं विराट म्हणाला. त्याला गणितात १०० पैकी तीन गुण मिळायचे, अशी माहितीही त्याने दिली. गणितातली किचकट आकडेवारी त्याला कधी जमली नाही. त्याला कायम हा प्रश्न पडायचा की मुळात गणित शिकवतातच का?

गणितात गती नसली तरी विराटला खेळात गती होती. खेळाचीच आवड आपल्या कामी आल्याचं त्याने प्रांजळपणे मान्य केलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज