अ‍ॅपशहर

विराट कोहलीकडून राष्ट्रगीताचा अपमान; चाहत्यांनी दिला टोकाचा इशारा

virat kohli national anthem: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीकडून एक मोठी चूक झाली. द.आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या वनडेत पाहा त्याने काय केले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Jan 2022, 12:26 pm
केपटाउन: भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तिसरी वनडे ४ धावांनी गमावली. यामुळे भारतावर मालिका ३-० अशी गमावण्याची वेळ आली. तिसऱ्या लढतीत भारताकडून शिखर धवन, विराट कोहली आणि दीपक चाहर यांनी अर्धशतकी खेळी केली. या सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी सर्व जण दीपकच्या खेळीचे कौतुक करत आहेत. पण सामन्यात अशी एक घटना झाली ज्यामुळे सर्वजण संतप्त झालेत.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम विराट कोहलीकडून राष्ट्रगीताचा अपमान


वाचा-कोणत्याही भारतीय कर्णधारावर अशी वेळ आली नाही; राहुलच्या नावावर झाला नकोसा विक्रम

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. विराटने एका पाठोपाठ एक टी-२० आणि कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. त्याच बरोबर त्याचे वनडेचे कर्णधारपद काढून घेण्यात आले. यामुळे विराट चर्चेत होता. पण आता तो अशा एका गोष्टीसाठी चर्चेत आलाय, ज्यामुळे देशातील अनेक चाहते त्याच्यावर नाराज झाले आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या वनडेच्या आधी राष्ट्रगीत सुरू असताना विराटने असे काही कृत्य केले ज्यामुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

वाचा- विजयाच्या उंबरठ्यावर बाद झाला दीपक चाहर; आयुष्यभर या गोष्टीचे....

प्रत्येक सामन्याआधी दोन्ही देशांचे राष्ट्रगीत म्हटले जाते. भारताचे राष्ट्रगीत सुरू असताना विराट कोहलीने जे कृत्य केले त्यावरून चाहते भडकले. राष्ट्रगीत सुरू असताना विराट चक्क च्युइंगम चगळत होता. विराटच्या या कृत्याने अनेक जण नाराज देखील झाले आहेत. काहींच्या मते हे कृत्य लाजिरवाणं आहे. काही चाहत्यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यावर अनेक जण तीव्र प्रतिक्रिया देखील देत आहेत.


वाचा- दीपकच्या मेहनतीवर पाणी; तिसऱ्या वनडेत लाज काढली,द.आफ्रिकेकडून भारताचा व्हाइटवॉश

राष्ट्रगीत सुरू असताना विराट कोहली मान खाली घालून उभा होता. तो राष्ट्रगीत देखील म्हणून नव्हता तर च्युइंगम चगळत उभा होता. विराटच्या या वागण्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. एका चाहत्याने तर थेट टोकाची प्रतिक्रिया दिली आहे. विराट तुला जर बीसीसीआय आवडत नसेल तर तु पाकिस्तानमध्ये जा, असे संबंधित युझर्स म्हटलय.

विराटने तिनही संघाचे कर्णधारपद सोडून फक्त फलंदाजीवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. यानंतर देखील तो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज