अ‍ॅपशहर

विराटचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू; कोहली पुन्हा होऊ शकतो कर्णधार

आयपीएलच्या गेल्या हंगामात त्याने दुसऱ्या पर्वापूर्वी कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली होती. या हंगामात, संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आणि एलिमिनेटरमध्ये केकेआरकडून पराभूत झाला होता.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 28 Jan 2022, 9:46 am
बेंगळुरू : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने नुकतेच कसोटी संघाचे कर्णधारपद सोडत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकापूर्वी त्याने आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चे कर्णधारपदही सोडले होते. आता अशी बातमी येत आहे की, आयपीएल २०२२ मध्ये विराट पुन्हा एकदा त्याच्या जुन्या भूमिकेत दिसणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम virat kohli can be seen again in ipl 2022 as skipper says rcb chairman
विराटचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू; कोहली पुन्हा होऊ शकतो कर्णधार


वाचा- पंड्याने ज्याला करिअर संपवण्याची धमकी दिली होती, त्याची रोहितच्या संघात निवड

फ्रँचायझीसाठी कर्णधारपदाची पहिली पसंती अजूनही विराट कोहलीच आहे. संघाने कायम ठेवलेल्या खेळाडूंपैकी सर्वाधिक १५ कोटी फक्त विराटलाच देण्यात आले आहेत. आरसीबी अध्यक्षांनी केलेल्या वक्तव्यामुळे कोहली पुन्हा एकदा आरसीबीची सूत्रे हाती घेताना दिसणार या चर्चेला जोर येऊ लागला आहे.

वाचा- 'जितक्या क्रिकेटपटूंना भेटलो त्यामध्ये हा भारतीय खेळाडू डोक्याने सर्वात...

याआधी श्रेयस अय्यर किंवा ग्लेन मॅक्सवेल यांना आरसीबीचा कर्णधार बनवण्याची चर्चा होती, पण ताज्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुन्हा एकदा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार विराट कोहली आरसीबीचा कर्णधार होऊ शकतो, असे दर्शवत आहे. फ्रँचायझी विराटला कर्णधारपदासाठी राजी करण्याचा प्रयत्न करेल, असे आरसीबीचे चेअरमन प्रथमेश मिश्रा यांनी म्हटले आहे.

वाचा- तो फोन जवळ ठेवत नाही आणि माझ्याकडे त्याचा नंबर देखील नाही

मिश्रा म्हणाले की, 'विराट कोहलीने अनेक संस्मरणीय हंगामात संघाचे नेतृत्व केले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने अनेक सामने जिंकले आहेत. आम्हाला अजूनही तो कर्णधार म्हणून हवा आहे. आम्ही त्याला कर्णधारपद परत घेण्यासाठी त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न करू. जर त्याने कर्णधारपदाची भूमिका स्वीकारली, तर विराट कोहली पुन्हा आरसीबीचा कर्णधार होईल.

वाचा- राहुल द्रविड टीम इंडियाचा प्रशिक्षक नाही, तर एक....; पाहा शेन वॉर्न काय म्हणाला

दरम्यान, विराट कोहलीने २०१३ मध्ये पहिल्यांदा आरसीबीची जबाबदारी स्वीकारली होती. तेव्हापासून २०२१ पर्यंत त्याने ८ हंगामात आयपीएल संघाचे नेतृत्व केले आहे, पण संघाला एकदाही आयपीएलचे जेतेपद त्याला मिळवून देता आले नाही. २०१६ मध्ये विराटच्या कर्णधारपदाखाली सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती, जेव्हा त्यांचा अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादकडून पराभूत झाले होते. तसेच कोहलीच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा संघ तीन वेळा (२०१५, २०२०, २०२१) प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. विराटने आत्तापर्यंत १४० सामन्यांमध्ये बंगळुरूचे नेतृत्व केले आहे, ज्यापैकी संघाने ६६ सामने जिंकले आहेत आणि ७० गमावले आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज