अ‍ॅपशहर

निवृत्तीबाबत कोहली काय म्हणतो, जाणून घ्या...

भारताचा कर्णधार विराट कोहलीने मात्र आपल्या निवृत्तीचा विचार करून ठेवला आहे. आपल्या निवृत्तीबाबतचे वचनही दिले असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. आज इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनने त्याला याबाबत प्रश्न विचारला होता. त्याटवर कोहलीने उत्तर दिले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Apr 2020, 8:39 pm
सध्याच्या घडीला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरु आहे. पण भारताचा कर्णधार विराट कोहलीने मात्र आपल्या निवृत्तीचा विचार करून ठेवला आहे. आपल्या निवृत्तीबाबतचे वचनही दिले असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम kohli


करोना व्हायरसचा प्रसार जगभरात झाला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन हा काही क्रिकेटपटूंना प्रश्न विचारत आहे. आज पीटरसनने भारताचा कर्णधार विराट कोहलीला काही प्रश्न विचारले. या प्रश्नांचे उत्तर देताना विराटने थेट निवृत्ती कधी घेणार, हेदेखील सांगून टाकले आहे.

पीटररसनने या मुलाखतीमध्ये कोहलीला त्याच्या निवृत्तीबाबत प्रश्न विचारला. यावर कोहली म्हणाला की, " जेव्हा मी मैदानात उतरतो तेव्हा मी दुपट्ट मेहनत घेत असतो. जेव्हा मी मैदानात उतरल्यावर १२० टक्के देणार नाही तेव्हा मी निवृत्ती पत्करेन. या गोष्टी प्रत्येकाने ठरवायच्या असतात. जेव्हा मला क्रिकेट खेळताना आनंद वाटणार नाही तेव्हापासून मी मैदानात उतरणार नाही, असे वचन मी स्वत:लाच दिले आहे."


पंतप्रधान मोदी यांनी आज ४९भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. यामध्ये महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, भारताचा विश्वविजेता माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, युवराज सिंग, झहीर खान, पीव्ही सिंधू, विश्वनाथन आनंद, हिमा दास, नीरज चोप्रा, मेरी कोम, विनेश फोगट, मनु भाकर या काही खेळाडूंचा समावेश होता.

या संवादाबाबत सौरव गांगुली म्हणाले की, " पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या महत्वाच्या आजी-माजी खेळाडूंबरोबर संवाद साधला. पण या संवादामध्ये नेमके त्यांनी आम्हाला काय सांगितले हे मी तुम्हाला सांगू शकत नाही."

याबाबत टाइम्स ऑफ इंडियाच्या एका सूत्रांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, " मोदी यांनी आज खेळाडूंशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी खेळाडूंना सांगितले की, लॉकडाऊन कसा पाळता येईल, याबद्दल लोकांना सांगा. त्याचबरोबर काही व्हिडीओ तयार करा. या व्हिडीओद्वारे तुम्हाला लोकांमध्ये जनजागृती करायची आहे. त्याचबरोबर त्यांना सुरक्षित राहण्याबाबत आवाहनही करायचे आहे."

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज