अ‍ॅपशहर

विराटचा अनबॉक्स न केलेला नवा फोन नागपुरात हरवला, कोहलीने ट्विट करत दिली माहिती

Virat Kohli Lost His New Phone: भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी भारत नागपुरात सराव करत असताना भारताचा माजी कर्णधार आणि फलंदाज विराट कोहलीचा नवा कोरा फोन हरवला आहे, याची त्याने स्वत: माहिती देली आहे.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Feb 2023, 2:05 pm
नागपूर: ९ फेब्रुवारीपासून सुरु होणारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामधील चार सामन्यांची मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. आजपर्यंतची कामगिरी पाहता भारत या मालिकेमध्ये आतापर्यंत वरचढ ठरला आहे. दोन्ही संघ या सामन्याच्या सरावासाठी कसून तयारी करत आहेत. यादरम्यानच भारतीय संघातून मोठी बातमी आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Virat KOhli lost his new phone in Nagpur


भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२३ साठी नागपुरात सराव करत आहे. दरम्यान, त्याने अनबॉक्स न केलेला त्याचा नवीन फोन हरवला आहे. त्याने फोन हरवल्याबद्दल एक ट्विट शेअर केले. या स्टार फलंदाजाचे ट्विट काही वेळातच व्हायरल झाले आणि चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

वाचा: ऑस्ट्रेलियाच्या क्लीन स्वीपसाठी कंबर कसून तयारी; पहिल्याच कसोटीत गेम करण्यासाठी भारताला मिळाले 'ब्रम्हास्त्र'


ट्विट करत विराट कोहली म्हणाला की, तुमचा नवा फोन अनबॉक्स न करता हरवण्याच्या दु:खापेक्षा मोठं काही नाही. माझा फोन कोणी पाहिला आहे का? असे तो म्हणाला. त्याच्या या ट्विटवर बरेच विविध रिप्लाय येत आहेत. यावर झोमॅटोने देखील कमेंट केली आहे. झोमॅटोने लिहिले की, 'अनुष्का वहिनीच्या फोनवरून आईस्क्रीम ऑर्डर करा'.


विराटच्या या ट्विटकडे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोहलीला विविध सल्लेही मिळत आहेत. त्यांच्यासोबत घडलेल्या अशाच घटना आठवून अनेक चाहते त्याला सहानुभूती देत आहेत, तर अनेक चाहत्यांनी नवीन खरेदी करा, तुमच्याकडे पैशांची थोडी कमतरता आहे, असे सांगितले.

हेही वाचा: रवी शास्त्रींनी दिला विजयाचा कानमंत्र! पहिल्या कसोटीसाठी अश्विनला सांगितला मास्टर प्लॅन


विराट कोहली विजयाच्या तयारीत व्यस्त

विराट कोहलीसह टीम इंडियाचे बाकीचे खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकण्यासाठी तयारी करत आहे. त्याने नेटवर तासंतास फलंदाजीचा सराव केला आहे. सरावाच्या वेळी त्याने स्वीप आणि रिव्हर्स स्वीपवर भर दिला. यावेळी भारताचा इरादा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तिसऱ्यांदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकण्याचा तयारीत आहे आणि विराट कोहली हे त्याच्या मिशनमधील सर्वात मोठे शस्त्र अहे.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख