मुंबई: बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या आगामी टी-२० मालिकेसाठीच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. नियमानुसार या मालिकेत कर्णधार विराट कोहली खेळणार नाही. या मालिकेतून विराटला विश्रांती देण्यात आली असून या मालिकेसाठी टीम इंडियाच्या कर्णधारपदाची सूत्रे रोहित शर्माकडे सोपविण्यात आली आहेत. मात्र, बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्याच्या कसोटी मालिकेत विराट खेळणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.
बांगलादेशविरुद्धच्या टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी ऋषभ पंतच्या जागी संजू सॅमसनचा संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच चहलचंही संघात पुनरागमन झालं आहे. मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेचा पहिल्यांदा संघात समावेश करणअयात आला आहे. त्याला हार्दीक पंड्याच्या जागी घेण्यात आलं आहे. या शिवाय मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरलाही संघात घेतलं आहे. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला विश्रांती देण्यात आल्यानं शार्दुलला संधी देण्यात आली आहे.
टीम इंडियाने ऑक्टोबर महिन्यात ५६ सामने खेळले आहेत. त्यापैकी ४८ सामन्यांमध्ये विराट खेळला आहे. विराट कोहलीला विश्रांती देण्याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना विचारण्यात आले होते. त्यावर हा निर्णय कर्णधारानेच घ्यायचा असल्याचं गांगुली यांनी म्हटलं होतं.
टी-२० टीम
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, कृणाल पंड्या, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, दीपक चाहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकुर
कसोटी संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋद्धिमान साहा, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुभमन गिल, ऋषभ पंत
कसोटीसाठी फक्त पाच स्टेडियम असावीत : विराट कोहली
विराट कोहलीनं अझहरुद्दीनचा 'हा' विक्रम मोडला!
बांगलादेशविरुद्धच्या टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी ऋषभ पंतच्या जागी संजू सॅमसनचा संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच चहलचंही संघात पुनरागमन झालं आहे. मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेचा पहिल्यांदा संघात समावेश करणअयात आला आहे. त्याला हार्दीक पंड्याच्या जागी घेण्यात आलं आहे. या शिवाय मुंबईचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरलाही संघात घेतलं आहे. अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला विश्रांती देण्यात आल्यानं शार्दुलला संधी देण्यात आली आहे.
टीम इंडियाने ऑक्टोबर महिन्यात ५६ सामने खेळले आहेत. त्यापैकी ४८ सामन्यांमध्ये विराट खेळला आहे. विराट कोहलीला विश्रांती देण्याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना विचारण्यात आले होते. त्यावर हा निर्णय कर्णधारानेच घ्यायचा असल्याचं गांगुली यांनी म्हटलं होतं.
टी-२० टीम
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, कृणाल पंड्या, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, दीपक चाहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकुर
कसोटी संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋद्धिमान साहा, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुभमन गिल, ऋषभ पंत
कसोटीसाठी फक्त पाच स्टेडियम असावीत : विराट कोहली
विराट कोहलीनं अझहरुद्दीनचा 'हा' विक्रम मोडला!