चेन्नई : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत मजबूत स्थितीत असलेल्या भारतीय संघाची तिसऱ्या दिवशी खराब सुरूवात झाली. एक बाद ५४ अशी धावसंख्यावरून भारताची अवस्था ५ बाद ८६ अशी झाली होती. तिसऱ्या दिवशी पहिली विकेट चेतेश्वर पुजाराच्या रुपाने पडली. तो धावबाद झाला.
वाचा- अर्जुन तेंडुलकरचा 'मास्टर ब्लास्टर' धमाका; एका ओव्हरमध्ये ५ षटकार आणि...
फिरकीपटू मोइन अलीच्या १९व्या ओव्हरच्या अंतिम चेंडूवर पुजाराने शॉर्ट लेगच्या दिशने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. पण तो फार दूर केला नाही. पुजाराने हा शॉर्ट पुढे येऊन मारला. तोपर्यंत ओली पोपने विकेटकिपर फॉक्सकडे चेंडू दिला. पुजाराने बॅट क्रिझवर टेकवली. पण तेव्हा चेंडू विकेटला लागला नव्हता. क्रिझवर पोहोचण्याच्या घाईत त्याच्या हातातून बॅट निसटली आणि फॉक्सने पुजाराला धावबाद केले. पुजारा सात धावांवर बाद झाला.
वाचा- अश्विनने बोल्ड काढल्यानंतर राग अनावर झाला; पाहा इंग्लंडच्या फलंदाजाने काय केले
पुजारानंतर ऋषभ पंत आणि अजिंक्य रहाणे देखील लवकर बाद झाले. त्यामुळे भारताची अवस्था ५ बाद ८६ अशी झाली. पण त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि आर अश्विन यांनी सातव्या विकेटसाठी ९६ धावांची भागिदारी केली आणि भारताला मोठी आघाडी मिळून दिली. विराट ६२ धावांवर बाद झाला.
वाचा- युवराज सिंगच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी दाखल केला FIR
भारतीय संघाने पहिल्या डावात ३२९ धावा केल्या होत्या. यात रोहित शर्माने १६१ धावा केल्या होत्या. त्यानंतर आर अश्विनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडचा पहिला डाव फक्त १३४ धावांवर संपुष्ठात आला. अश्विने पाच विकेट घेतल्या. भारतीय संघाची आघाडी ४००च्या जवळ पोहोचली असून टीम इंडिया ही आघाडी कितीपर्यंत वाढवते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
वाचा- अर्जुन तेंडुलकरचा 'मास्टर ब्लास्टर' धमाका; एका ओव्हरमध्ये ५ षटकार आणि...
फिरकीपटू मोइन अलीच्या १९व्या ओव्हरच्या अंतिम चेंडूवर पुजाराने शॉर्ट लेगच्या दिशने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. पण तो फार दूर केला नाही. पुजाराने हा शॉर्ट पुढे येऊन मारला. तोपर्यंत ओली पोपने विकेटकिपर फॉक्सकडे चेंडू दिला. पुजाराने बॅट क्रिझवर टेकवली. पण तेव्हा चेंडू विकेटला लागला नव्हता. क्रिझवर पोहोचण्याच्या घाईत त्याच्या हातातून बॅट निसटली आणि फॉक्सने पुजाराला धावबाद केले. पुजारा सात धावांवर बाद झाला.
वाचा- अश्विनने बोल्ड काढल्यानंतर राग अनावर झाला; पाहा इंग्लंडच्या फलंदाजाने काय केले
पुजारानंतर ऋषभ पंत आणि अजिंक्य रहाणे देखील लवकर बाद झाले. त्यामुळे भारताची अवस्था ५ बाद ८६ अशी झाली. पण त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि आर अश्विन यांनी सातव्या विकेटसाठी ९६ धावांची भागिदारी केली आणि भारताला मोठी आघाडी मिळून दिली. विराट ६२ धावांवर बाद झाला.
वाचा- युवराज सिंगच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी दाखल केला FIR
भारतीय संघाने पहिल्या डावात ३२९ धावा केल्या होत्या. यात रोहित शर्माने १६१ धावा केल्या होत्या. त्यानंतर आर अश्विनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडचा पहिला डाव फक्त १३४ धावांवर संपुष्ठात आला. अश्विने पाच विकेट घेतल्या. भारतीय संघाची आघाडी ४००च्या जवळ पोहोचली असून टीम इंडिया ही आघाडी कितीपर्यंत वाढवते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.