अ‍ॅपशहर

भारतात कधी होणार महिलांच्या IPLचे आयोजन? BCCI सचिव जय शाह यांनी केला खुलासा

IPL: बीसीसीआय पुरुषांच्या आयपीएलसोबत महिलांसाठी टी-२० चॅलेंज स्पर्धेचे आयोजन करते, पण या स्पर्धेत फक्त तीन संघ सहभागी होत आहेत. पाहा याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शहा काय म्हणाले.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 29 Dec 2021, 5:35 pm
नवी दिल्ली : भारतातील महिला क्रिकेट दिवसेंदिवस नवीन उंची गाठत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू आता परदेशातील लीगमध्येही आपली छाप पाडत आहेत. ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग आणि इंग्लंडमधील 'द हंड्रेड' या स्पर्धा भारतीय खेळाडूंनी गाजवल्या आहेत. त्यामुळे भारतातही महिला आयपीएलची वारंवार चर्चा होत आहे. देशातील महिला आयपीएलबाबत भारतीय खेळाडूंनीही सातत्याने आवाज उठवला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम we are working towards an ipl style league for women says bcci secretary jay shah
भारतात कधी होणार महिलांच्या IPLचे आयोजन? BCCI सचिव जय शाह यांनी केला खुलासा


वाचा- दक्षिण आफ्रिकेला देणार इतक्या धावांचे टार्गेट; भारतीय खेळाडूने केला खुलासा

हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह म्हणाले की, बीसीसीआय महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएलसारखी लीग आणण्यावर काम करत आहे. महिला टी-२० स्पर्धेविषयी चाहत्यांमध्ये खूप उत्साह आहे. महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएलसारखी लीग आपल्या सर्वांना हवी आहे. पण तीन-चार संघांना एकत्र करून महिलांची आयपीएल सुरू करता येणार नाही.

वाचा- क्रिकेटवर पुन्हा एकदा संक्रांत; वनडे मालिका रद्द

अनेक गोष्टी महत्त्वाच्या
शाह पुढे म्हणाले की, यासाठी अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. स्पर्धेसाठी वेळ, आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपलब्धता, दोन क्रिकेट बोर्डांमधील द्विपक्षीय करार यासारखे अनेक घटक महत्त्वाचे आहेत. आम्ही सर्व पर्यायांचा विचार करत असून भविष्यात महिला खेळाडूंसाठी अशाच प्रकारची लीग आयोजित करण्यावर काम करत आहोत. स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौरसारख्या खेळाडूंनी भारताची स्वतःची महिला लीग असली पाहिजे आणि त्याचा देशाच्या क्रिकेटला कसा फायदा होईल, याबद्दल खुलेपणाने सांगितले आहे.

वाचा- पहिल्या कसोटीत भारताला विजयाची संधी; फक्त या एका गोष्टीचा अडथळा

दरम्यान, शाह यांनी परदेशी टी-२० लीगमध्ये सहभागी झालेल्या भारताच्या खेळाडूंचे कौतुक केले. ते म्हणाले, “आयपीएलसारख्या लीगमुळे आमच्या खेळाडूंना निश्चितच मदत होईल. कारण त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळेल. स्मृती आणि हरमनप्रीत व्यतिरिक्त भारताच्या उर्वरित खेळाडूंनीही परदेशी टी-२० लीगमध्ये चांगली कामगिरी केली आहे. दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा आणि पूनम यादव यांनी द हंड्रेड आणि डब्ल्यूबीबीएल या परदेशी लीगमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे आणि आता त्या भारतातील रोल मॉडेल बनल्या आहेत. त्या स्पर्धांमध्ये खेळल्याने त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल.”

महत्वाचे लेख