अ‍ॅपशहर

वनडे क्रिकेटच्या इतिहासात अक्षर पटेलने जे केले ते याआधी कोणीच करू शकले नाही; वाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Axar Patel: भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात २ विकेट आणि २ चेंडू राखून सनसनाटी विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला अक्षर पटेल.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jul 2022, 11:42 am
पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद): वेस्ट इंडिजविरुद्ध रविवारी झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय लढतीत भारताने धडाकेबाज विजय मिळवला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताच्या अक्षर पटेलने अशी काही फलंदाजी केली ज्यामुळे जग त्याचे कौतुक करत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Axar Patel Creates World Record


प्रथम फलंदाजी करत वेस्ट इंडिजने भारताला ३१२ धावांचे आव्हन दिले होते. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या भारताची सुरूवात संथ झाली. पहिल्या १० षटकात फक्त ४२ धावा केल्या होत्या. चौथ्या विकेटसाठी श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांनी ९९ धावांची भागिदारी केली. त्यानंतर ऑलराउंडर अक्षर पटेलने जे केले त्यामुळे वनडे क्रिकेटमधील एका नव्या विक्रमाची नोंद झाली.

वाचा- विजय वेस्ट इंडिजवर पण धक्का बसला पाकला; वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच टीम इंडियानं केला

अक्षरने ३५ चेंडूत नाबाद ६४ धावा केल्या. यात ५ षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. अक्षरच्या या खेळीत वनडे क्रिकेटच्या ५१ वर्षाच्या इतिहासात कधीच न झालेला एक विक्रम नोंदवला गेला.

वाचा- विजयाचा हिरो ठरला संजू; सिराजने तर मॅच घालवली होती, VIDEO पाहून पंतला विसराल

वनडे क्रिकेटच्या इतिहासात ३०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना इतक्या खालच्या क्रमांकावर आलेल्या फलंदाजाकडून झालेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. वनडेमध्ये ३०० धावांचा पाठलाग करताना सातव्या क्रमांकावर कोणत्याही फलंदाजाने आजवर इतकी धावसंख्या केली नाही.


अक्षरच्या या खेळीमुळे संघातील रविंद्र जडेजासह अन्य तळातील फलंदाजांवर कामगिरी करण्याचा दबाव येईल. गेल्या काही दिवसात अक्षरने फलंदाजीवर काम केले आहे आणि त्याचा हा परिणाम आहे की मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना त्याने स्वत:च्या फलंदाजीच्या जोरावर विजय मिळून दिला.

वाचा- सराव थांबवला, प्रशिक्षकांना घरी पाठवले, भारताच्या ऑलिम्पिकपदक विजेतीचा

या विजयामुळे भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची सलग १२वी मालिका जिंकली. वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाविरुद्ध याआधी आजवर अशी कामगिरी झाली नव्हती. याआधीचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता, त्यांनी झिम्बाब्वेचा सलग ११ मालिकेत पराभव केला होता.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख