अ‍ॅपशहर

भारतीय संघ आशिया चषकातून बाहेर पडणार की राहणार, फक्त सहा तासांमध्ये होणार फैसला...

Asia cup final : सलग दुसऱ्या पराभवानंतर भारताचा अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग धुसर झाला आहे. पण त्यांचे आव्हान अजूनही संपुष्टात आले आहे, असे म्हणता येणार नाही. कारण भारताला अजून आशिया चषकाच्या फायनलमध्ये पोहोचता येऊ शकते. पण भारत फायनलमध्ये पोहोचणार की नाही, याचा फैसला काही तासांमध्येच होणार आहे. भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचणार की नाही, हे आता बुधवारी होणाऱ्या सामन्यावर अवलंबून असेल.

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 7 Sep 2022, 5:22 pm
दुबई : भारतीय संघ सलग दोन पराभवानंतरही आशिया चषकातून बाहेर पडलेला नाही. पण भारतीय संघाचे आता आशिया चषकाच्या स्पर्धेत आव्हान कायम राहणार की नाही, याचा निर्णय फक्त २४ तासांमध्येच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rohit sharma
सौजन्य-ट्विटर


भारताचा सुपर-४ फेरीतील हा सलग दुसरा पराभव होता. भारताने हा सामना जिंकला असता तर त्यांच्यासाठी अंतिम फेरीचा मार्ग सुकर झाला असता. पण या पराभवाने भारताचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे गणित फिस्कटले आहे. कारण या सलग दुसऱ्या पराभवानंतर भारताचा अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग धुसर झाला आहे. पण त्यांचे आव्हान अजूनही संपुष्टात आले आहे, असे म्हणता येणार नाही. कारण भारताला अजून आशिया चषकाच्या फायनलमध्ये पोहोचता येऊ शकते. पण भारत फायनलमध्ये पोहोचणार की नाही, याचा फैसला काही तासांमध्येच होणार आहे.

भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचणार की नाही, हे आता बुधवारी होणाऱ्या सामन्यावर अवलंबून असेल. कारण अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आता बुधवारी होणार आहे. या सामन्यात अफगाणिस्तानने जर पाकिस्तानला पराभूत केले तर भारताला फायनलमध्ये पोहोचण्याचा दरवाजा किलकिला होऊ शकतो. कारण पाकिस्तानचा हा सुपर-४मधील पहिला पराभव असेल. स्पष्ट सांगायचे तर पाकिस्तानने दोन्ही सामने गमावले आणि भारताने अफगाणिस्तानवर मोठा विजय साकारला तरच भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचू शकतो, अन्यथा भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडू शकतो. त्यामुळे आता पहिल्यांदा तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात नेमकं काय होतं, हे पाहावे लागेल. कारण या एका सामन्यावर भारताचे भवितव्य अवलंबून असणार आहे. पाकिस्तानचा पराभव हा भारताच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची पहिली पायरी असेल. कारण श्रीलंकेने पाकिस्तानला पराभूत केले, तर भारताला अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी असू शकेल. पण त्यासाठी पहिल्यांला अफगाणिस्तानने पाकिस्तानसा पराभूत करणे गरजेचे आहे. जर पाकिस्तानने हा सामना जिंकला तर भारतीय संघाचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज