लंडन : भारताने तिसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकाही जिंकली. मालिका जिंकल्यावर विजयी चषक कर्णधार रोहित शर्माकडे देण्यात आला. पण रोहितने हा चषक संघातील वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगच्या हातामध्ये दिला. रोहितने विजयाचा चषक अर्शदीपच्या हातामध्येच का दिला, याते कारण समोर आले आहे.
शतकवीर रिषभ पंतने चौकार लगावला आणि भारताने विजयावर शिक्कामोर्तब केले. भारतीय खेळाडूंनी त्यावेळी एकच जल्लोष केला आणि त्यानंतर मैदानात जोरदार सेलिब्रेशन सुरु झाले. भारताच्या खेळाडूंनी शॅम्पेनच्या बाटल्या फोडल्या आणि त्यांनी रोहित शर्माला चिंब करून टाकले. त्यावेळी रोहित शर्मा चिडलेला पाहायला मिळाला. पण रोहित काही वेळातच शांत झाला. पण या सर्व प्रकारात तो विजयाचा चषक अर्शदीपच्या हातामध्ये द्यायला विसरला नाही. आयपीएमधील दमदार कामगिरीनंतर अर्शदीपची भारतीय संघात निवड झाली. अर्शदीपने इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताकडून पदार्पण केले होते. हा सामान ७ जुलैला खेळवण्यात आला होता. अर्शदीपची भारताच्या वनडे संघातही निवड करण्यात आली होती. पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. पण तरीही रोहितने अर्शदीपच्या हातामध्ये विजयाचा चषक दिला होता. या गोष्टीमागे एक कारण आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी जेव्हा संघाचे नेतृत्व करत होता तेव्हा त्याने एक गोष्ट सुरु केली होती आणि ती परंपरा अजूनही भारतीय संघात कायम आहे. धोनी कोणतीही मालिका जिंकल्यावर विजयी चषक संघातील युवा खेळाडूच्या हातामध्ये सुपूर्द करायचा. जेणेकरून त्याला खेळण्याची प्रेरणा मिळावी. हीच गोष्ट आता रोहित शर्माही कर्णधारपद स्विकारल्यावर कायम ठेवत आहे. अर्शदीपला या मालिकेत संधी मिळाली नव्हती. पण तरीही त्याला प्रेरणा मिळावी आणि भारतीय संघातील ही परंपरा कायम ठेवली आहे. त्यामुळे रोहितने जेव्हा विजयाचा चषक पटकावला तेव्हा त्याने तो अर्शदीपच्या हातामध्ये दिला होता. अर्शदीपला चषक देताना रोहितचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
शतकवीर रिषभ पंतने चौकार लगावला आणि भारताने विजयावर शिक्कामोर्तब केले. भारतीय खेळाडूंनी त्यावेळी एकच जल्लोष केला आणि त्यानंतर मैदानात जोरदार सेलिब्रेशन सुरु झाले. भारताच्या खेळाडूंनी शॅम्पेनच्या बाटल्या फोडल्या आणि त्यांनी रोहित शर्माला चिंब करून टाकले. त्यावेळी रोहित शर्मा चिडलेला पाहायला मिळाला. पण रोहित काही वेळातच शांत झाला. पण या सर्व प्रकारात तो विजयाचा चषक अर्शदीपच्या हातामध्ये द्यायला विसरला नाही.