अ‍ॅपशहर

IND vs ENG: तिसऱ्या वनडेसाठी जसप्रीत बुमराला रोहित शर्माने का केले संघाबाहेर, जाणून घ्या मोठं कारण...

IND vs ENG 3rd ODI: तिसऱ्या सामन्यापूर्वी रोहितने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्विकारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रोहितने तिसऱ्या वनडेसाठी संघ जाहीर केला. यावेळी रोहित शर्माने जसप्रीत बुमाराला संघात स्थान न दिल्याचे सांगितले. पण बुमराला या सर्वात महत्वाच्या सामन्यात संघात स्थान का दिले नाही, हेदेखील रोहितने सांगितले आहे. बुमराच्या जागी संघात कोणाला स्थान दिले आहे पाहा...

Authored byप्रसाद लाड | Maharashtra Times 18 Jul 2022, 11:00 am
लंडन : भारतीय संघ आता तिसऱ्या वनडे सामन्यासाठी सज्ज झाला आहे. पण या सामन्यासाठी जेव्हा संघ निवडण्यात आला तेव्हा जसप्रीत बुमराला संधी देण्यात आली नसल्याचे समोर आले. रोहित शर्मा जसप्रीत बुमराला संघाबाहेर का केले, याचे कारणही आता समोर आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Jasprit Bumrah


भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांसाठी हा सामना सर्वात महत्वाचा असणार आहे. कारण या मालिकेत भारत आणि इंग्लंड यांची १-१ अशी बरोबरी झाली आहे. त्यामुळे मँचेस्टरच्या मैदानात जो तिसरा वनडे सामना होणार आहे तो निर्णायक ठरणार आहे. कारण हा सामना जो जिंकेल, त्याला मालिका जिंकता येणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ जीवाचे रान करतील. पण या महत्वाच्या सामन्यात मात्र बुमरा हा भाररतीय संघात नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

तिसऱ्या सामन्यापूर्वी रोहितने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्विकारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रोहितने तिसऱ्या वनडेसाठी संघ जाहीर केला. यावेळी रोहित शर्माने जसप्रीत बुमाराला संघात स्थान न दिल्याचे सांगितले. बुमराच्या पाठीमध्ये दुखत आहे आणि त्यामुळेच त्याला या सामन्यात संधी देण्यात आलेली नाही, हे रोहितने यावेळी स्पष्ट केले. बुमराच्या जागी भारतीय संघात यावेळी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता डावाची सुरुवात मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज करतील, असे दिसत आहे. त्यामुळे आता सिरजाला या सामन्यात या संधीचे सोने करतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

रोहित शर्माने या मालिकेत सलग तिसऱ्यांदा टॉस जिंकल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यात टॉस जिंकत रोहितने प्रथम गोलंदाजी स्विकारली होती आणि हा सामना भारताने जिंकला होता. दुसऱ्या सामन्यातही रोहितने टॉस जिंकला होता, पण भारताला हा सामना गमवावा लागला होता. आता तिसऱ्या सामन्यातही रोहितने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.
लेखकाबद्दल
प्रसाद लाड
प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम केले आहे. क्रीडा पत्रकारितेमध्ये ते जवळपास १६ वर्षांपासून आहेत.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज