वृत्तसंस्था, ऑस्ट्रेलिया
महिलांच्या टी-२० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारत-इंग्लंड उपांत्य झुंज पावसामुळे वाया गेल्यानंतर गटात अव्वल असलेल्या भारताचा अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग गुरुवारी मोकळा झाला. या वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. आता रविवारी, ८ मार्चला भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात विजेतेपदासाठी अंतिम झुंज रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाने गुरुवारी दुसऱ्या उपांत्य सामन्यांत दक्षिण आफ्रिकेवर ५ धावांनी मात केली. रविवारी, ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन असल्यामुळे भारतीय महिला विजेतेपदाची भेट क्रिकेटचाहत्यांना देणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
भारत-इंग्लंडदरम्यानच्या उपांत्य लढतीवर पावसाचे सावट होते. त्याप्रमाणे मुसळधार पावसाचा फटका या लढतीला बसला आणि एकही चेंडू न टाकता लढत रद्द झाली. गटात अव्वल स्थानी असल्यामुळे नियमाप्रमाणे भारताचा अंतिम फेरीत प्रवेश निश्चित झाला. दुसऱ्या उपांत्य लढतीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर डकवर्थ लुईस नियमानुसार पाच धावांनी मात केली.
भारताने 'अ' गटात सलग चार विजय मिळवून अव्वल स्थान पटकावले होते. टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताला एकदाही इंग्लंडला नमविता आले नव्हते. या वेळीदेखील इंग्लंडला नमविण्याची संधी पावसामुळे भारताला मिळाली नाही. सिडनीत सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नाणेफेकीलाही उशिरा झाला. पण नंतर पाऊस थांबलाच नाही आणि लढत रद्द करण्याचा निर्णय झाला. इंग्लंडच्या खेळाडूंना आपली नाराजी लपविता आली नाही. उपांत्य झुंजीसाठी राखीव दिवस असला पाहिजे, ही मागणी मात्र खेळाडू करताना दिसले.
-महिला टी-२० क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताचा प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश
-ऑस्ट्रेलियाने सलग सहाव्यांदा टी-२० वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली
-सन २०१०, २०१२, २०१४ आणि २०१८ असे चार वेळा ऑस्ट्रेलिया विजेते
...
द्या शुभेच्छासंदेश
टी-२० क्रिकेट जगज्जेतेपद भारतीय महिला संघाला मिळावे यासाठी तुम्हा वाचकांचा पाठिंबाही मोलाचा आहे. त्यासाठी @mataonline @BCCI @BCCIWomen या ट्विटर हँडल्सवर तुमचा मराठीतील संदेश #NariShakti सह टॅग करा आणि ट्विट करा. शुभेच्छासंदेश शनिवारी, ७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ट्विट करा. या मुदतीत येणाऱ्या संदेशांतील सर्वोत्तम संदेशांना रविवारी, अंतिम सामन्याच्या दिवशी, 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रसिद्धी देण्यात येईल.
महिलांच्या टी-२० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारत-इंग्लंड उपांत्य झुंज पावसामुळे वाया गेल्यानंतर गटात अव्वल असलेल्या भारताचा अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा मार्ग गुरुवारी मोकळा झाला. या वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. आता रविवारी, ८ मार्चला भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात विजेतेपदासाठी अंतिम झुंज रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाने गुरुवारी दुसऱ्या उपांत्य सामन्यांत दक्षिण आफ्रिकेवर ५ धावांनी मात केली. रविवारी, ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन असल्यामुळे भारतीय महिला विजेतेपदाची भेट क्रिकेटचाहत्यांना देणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
भारत-इंग्लंडदरम्यानच्या उपांत्य लढतीवर पावसाचे सावट होते. त्याप्रमाणे मुसळधार पावसाचा फटका या लढतीला बसला आणि एकही चेंडू न टाकता लढत रद्द झाली. गटात अव्वल स्थानी असल्यामुळे नियमाप्रमाणे भारताचा अंतिम फेरीत प्रवेश निश्चित झाला. दुसऱ्या उपांत्य लढतीत गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर डकवर्थ लुईस नियमानुसार पाच धावांनी मात केली.
भारताने 'अ' गटात सलग चार विजय मिळवून अव्वल स्थान पटकावले होते. टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताला एकदाही इंग्लंडला नमविता आले नव्हते. या वेळीदेखील इंग्लंडला नमविण्याची संधी पावसामुळे भारताला मिळाली नाही. सिडनीत सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नाणेफेकीलाही उशिरा झाला. पण नंतर पाऊस थांबलाच नाही आणि लढत रद्द करण्याचा निर्णय झाला. इंग्लंडच्या खेळाडूंना आपली नाराजी लपविता आली नाही. उपांत्य झुंजीसाठी राखीव दिवस असला पाहिजे, ही मागणी मात्र खेळाडू करताना दिसले.
-महिला टी-२० क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताचा प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश
-ऑस्ट्रेलियाने सलग सहाव्यांदा टी-२० वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली
-सन २०१०, २०१२, २०१४ आणि २०१८ असे चार वेळा ऑस्ट्रेलिया विजेते
...
द्या शुभेच्छासंदेश
टी-२० क्रिकेट जगज्जेतेपद भारतीय महिला संघाला मिळावे यासाठी तुम्हा वाचकांचा पाठिंबाही मोलाचा आहे. त्यासाठी @mataonline @BCCI @BCCIWomen या ट्विटर हँडल्सवर तुमचा मराठीतील संदेश #NariShakti सह टॅग करा आणि ट्विट करा. शुभेच्छासंदेश शनिवारी, ७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ट्विट करा. या मुदतीत येणाऱ्या संदेशांतील सर्वोत्तम संदेशांना रविवारी, अंतिम सामन्याच्या दिवशी, 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रसिद्धी देण्यात येईल.