अ‍ॅपशहर

WTC फायनल IND vs AUS: मॅच ड्रॉ झाली तर कोण होणार चॅम्पियन, काय सांगतो ICCचा नियम

WTC Final 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची लढत उद्या ७ जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. लंडनच्या ऐतिहासिक द ओव्हल मैदानावर होणाऱ्या या लढतीकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jun 2023, 12:58 pm
लंडन: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची सुरुवात ७ जूनपासून होत आहे. दोन्ही संघ लंडनच्या द ओव्हल मैदानावर जेतेपदासाठी लढतील. भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. गेल्यावेळी म्हणजे २०२१ मध्ये फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. आता टीम इंडियाचा प्रयत्न असेल की दुसऱ्यांदा आलेली संधी गमवू नये.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ind vs aus wtc


पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाली होती. तेव्हा पावसामुळे मॅच राखीव दिवशी म्हणजे सहाव्या दिवशी झाली होती. इंग्लंडचे हवामान लहरी असल्याने कधी पावसाला सुरुवात होईल याचा भरवसा नाही. अशात यावेळी देखील मॅच इंग्लंडमध्ये होत आहे आणि म्हणूनच चाहत्यांना प्रश्न पडला आहे की गेल्या वेळी प्रमाणे काही झाले किंवा मॅच ड्रॉ झाली तर चॅम्पियन कोण होणार.

Sex Championship: सेक्स चॅम्पियनशिप स्पर्धाबाबत आली मोठी अपडेट; आयोजकांनी या स्पर्धेसाठी...
गेल्या काही वर्षात कसोटी सामन्यांचे निकाल लागत असेल तरी ड्रॉ मॅचची संख्या कमी नाही. अशाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल कोणत्याही कारणामुळे ड्रॉ झाली तर कोणता संघ विजय होईल. याबाबत आयसीसीचा नियम काय सांगतो? नुकत्याच झालेल्या आयपीएल फायनलची मॅच झाली नसती तर साखळी फेरीनंतर गुणतक्त्यात अव्वल स्थानी असलेल्या गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळाले असते. असाच नियम WTCसाठी देखील आहे का? जाणून घेऊयात...

WTC Finalच्या आधी भारतासाठी आली गुड न्यूज; टीम इंडियाने गाजवले आहे ओव्हल मैदान, अखेरच्या...
आयसीसीच्या नियमानुसार जर फायनल मॅच ड्रॉ झाली तर कोणताही एक नाही तर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघांना संयुक्त विजेता म्हणून जाहीर केले जाईल. अर्थात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोघांचीही इच्छा नसेल की त्यांना संयुक्त विजेतेपद मिळावे. दोघांचा असाच प्रयत्न असेल की चॅम्पियनशिप मिळवावी.

द्विशतक करणाऱ्या फलंदाजाला संघाबाहेर ठेवा, ५ पैकी ३ गोलंदाज हे...; गावस्करांचा मोलाचा सल्ला
आयपीएलचा १६वा हंगाम खेळल्यानंतर भारतीय खेळाडू लंडनमध्ये दाखल झाले आहेत. खेळाडूंनी सराव देखील सुरु केला आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड यांच्या समोर सर्वात मोठे आव्हान असेल ते संघ निवडीचे होय. गेल्या वेळी फायनल मॅचमध्ये भारताने दोन फिरकीपटू खेळवले होते आणि संघाचा पराभव झाला होता. यावेळी रोहित शर्मा काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख