अ‍ॅपशहर

WTC Finalवर मजबूत पकड तरी ऑस्ट्रेलियाला वाटते भारताची भीती; डोळ्यासमोर येतात ते दोन ऐतिहासिक पराभव

IND vs AUS Test: द ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये भारतावर फॉलोऑनचे संकट असले तरी याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने जोरदार कमबॅक केले.

Authored byजयकृष्ण नायर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jun 2023, 4:27 pm
ओव्हल: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच द ओव्हल मैदानावर सुरू आहे. ७ जूनपासून सुरू झालेल्या या लढतीच्या पहिल्या दोन दिवशी ऑस्ट्रेलियाने मजबूत पकड मिळवली आहे. ऑस्ट्रेलियाने ट्रेव्हिस हेड आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या शतकांच्या जोरावर ४६९ धावा उभ्या केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने ५ बाद १५१ धावा केल्या होत्या. भारत ३१८ धावांनी पिछाडीवर होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ind vs aus


आता चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा भारताने केएस भरतच्या रुपाने सहावी विकेट गमावली. या लढतीत भारत सध्या बॅकफुटवर दिसत आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या गटात तसेच चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेकांना वाटत आहे की भारत ही लढत गमावेल. पण टीम इंडियाचा इतिहास मात्र काही वेगळेच सांगतो.

भारताला ओव्हलवर ऑस्ट्रेलियाचा पराभव करायचा असेल आणि WTCचे विजेतेपद मिळवायचे असेल तर २० वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेली कामगिरी पुन्हा एकदा करावी लागले. २००३ साली झालेल्या कसोटी मालिकेतील दुसरी कोसटी १२ ते १६ डिसेंबर या काळात एडिलेड येथे झाली होती. तेव्हा ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ५५६ धावांचा डोंगर उभा केला होता. अनिल कुबंळेने ५ विकेट मिळवल्या होत्या.

आउट होऊन देखील खेळत राहिला अजिंक्य रहाणे, कर्णधार कमिन्सची एक चूक ऑस्ट्रेलियाला महागात पडू शकते
उत्तरादाखल भारताला पहिल्या डावात ५२३ धावा करून ऑस्ट्रेलियाला सडेतोड उत्तर दिले. तेव्हा राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी शानदार फलंदाजी केली होती. द्रविडने तिसऱ्या क्रमांकावर येत २३३ तर लक्ष्मणने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत १४८ धावा केल्या होत्या. अर्थात पहिल्या डावात भारत २३ धावांनी पिछाडीवर होता. दुसऱ्या डावात भारताने ऑस्ट्रेलियाला १९६ धावांवर गुंडाळले. अजित आगरकरने ४१ धावा देत ६ विकेट घेतल्या होत्या.भारताला विजयासाठी २३० धावांचे टार्गेट मिळाले होते. टीम इंडियाने हे टार्गेट ६ विकेटच्या बदल्यात पार केले.

मनाची तयारी ठेवा, टीम इंडियाला पुन्हा उपविजेतेपद; ओव्हल मैदानावर पहिल्याच दिवशी पाहा काय झालं
ऑस्ट्रेलियाला अशा प्रकारचा धडा शिकवण्याची ही एकमेव वेळ नाही. २००१ साली भारताने कोलकाता कसोटीत ऑस्ट्रेलियाचा जो पराभव केला होता तो क्रिकेटच्या इतिहासात लिहला गेला आहे. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाने तेव्हा ४४५ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात भारताला डाव गडगडला आणि १७१ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला फॉलोऑन दिला. भारताने दुसऱ्या डावात अशी काही फलंदाजी केली ज्याने ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचा पाया रचला.

स्वत:च्या ट्रॅपमध्ये अडकला भारत; दिग्गज खेळाडूने रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांना सुनावले
दुसऱ्या डावात भारताकडून लक्ष्णमने २८१ धावांची ऐतिहासिक खेळी केली. तर द्रविडने १८० धावा केल्या. भारताने ७ बाद ६५७ धावांवर डाव घोषित केला आणि ऑस्ट्रेलियाला ३८३ धावांचे टार्गेट दिले. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात हरभजन सिंगने त्यांना फिरकीवर नाचवले. त्याने ६ विकेट घेतल्या तर सचिन तेंडुलकरने ३ विकेट मिळवल्या. भारताने कोलकाता कसोटी १७१ धावांनी जिंकली. आता देखील ओव्हल मैदानावर टीम इंडियाला अशाच प्रकारची कामगिरी करावी लागणार आहे.
लेखकाबद्दल
जयकृष्ण नायर
जयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज