अ‍ॅपशहर

WTC Final 2023: भारतासाठी चौथ्या दिवशी इंद्रदेव मदतीला येणार? असं आहे ओव्हलमधील हवामान

WTC Final Day 4 Weather: ओव्हलवर चौथ्या दिवशी पाऊस हजेरी लावणार असल्याची चिन्हे आहेत. तीन दिवसीय खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी २९६ धावांवर पोहोचली आहे.

Authored byभक्ती गुरव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Jun 2023, 10:50 am
लंडन: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सुरू आहे. तीन दिवसांचा खेळ संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ या णतिं सामन्यात भारतापेक्षा पुढे असल्याचे दिसत आहे. आतापर्यन्त ऑस्ट्रेलियाकडे २९६ धावांची आघाडी आहे आणि ६ विकेट्सही शिल्लक आहेत. त्यामुळे आता टीम इंडिया अंतिम सामन्यात पराभवाच्या उंबरठ्यावर उभी आहे. त्यामुळे भारताच्या मदतीला चौथ्या दिवशीच्या सामन्यात इंद्रदेव येणार आहे. पाऊसदेखील आजच्या सामन्यात हजेरी लावणार असल्याची चिन्हे आहेत. आज चौथ्या दिवशी ओव्हलचे हवामान कसे असेल जाणून घ्या.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम WTC Final Weather Update


ओव्हल येथे पहिले तीन दिवस हवामान स्वच्छ असले तरी चौथ्या आणि पाचव्या दिवशी ढगाळ वातावरण राहील. ओव्हल येथे चौथ्या आणि पाचव्या दिवशी हलका पाऊस पडू शकतो. अशा परिस्थितीत चौथ्या आणि पाचव्या दिवसाचा खेळ पावसात वाहून जाणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे; तर जाणून घ्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी कसे हवामान असेल जाणून घ्या.

चौथ्या आणि पाचव्या दिवसाचा हवामानाचा अंदाज

चौथ्या आणि पाचव्या दिवशी म्हणजे १० आणि ११ जून रोजी ओव्हलवर वादळासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. शनिवारी मुसळधार पावसाची ७०% शक्यता आणि वादळाची २८% शक्यता आहे. परिणामी, चौथ्या दिवशी खेळ काही तासांसाठी थांबवला जाऊ शकतो. दुसरीकडे, फायनलच्या पाचव्या दिवशी म्हणजे ११ जून रोजी पावसाची ८८ टक्के शक्यता आहे. वादळाची ३५ टक्के शक्यता आहे. अशा स्थितीत उरलेल्या दोन दिवसांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे.


अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. याचा अर्थ असा की जर पावसामुळे चौथ्या (१० जून) किंवा पाचव्या (११ जून) दिवशी खेळ झाला नाही, तर निकाल मिळविण्यासाठी सामना सहाव्या दिवशी म्हणजेच १२ जून रोजी खेळवला जाईल. तत्पूर्वी, २०२१ मध्ये खेळल्या गेलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिल्याच अंतिम फेरीचा निकालही राखीव दिवशी म्हणजेच सहाव्या दिवशी घोषित करण्यात आला होता.
लेखकाबद्दल
भक्ती गुरव
"भक्ती गुरव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. क्रीडासोबतच अर्थविषयक बातम्यांमध्ये रस."... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज