नवी दिल्ली: महेंद्र सिंह धोनी आज ३९वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार धोनीचा प्रवास एका छोट्या शहरातून झाला. सध्या धोनी क्रिकेट मैदानापासून बऱ्याच दिवसांपासून दूर असला तरी चाहत्यांचे प्रेम कमी झाले नाही. धोनी आज ज्या ठिकाणी पोहोचला आहे त्यासाठी त्याने प्रचंड संघर्ष केला. एक नजर धोनीने भारतीय क्रिकेट दिलेले खास क्षणांवर...
वाचा- लाइटहाऊस पाहिलं की तुझी आठवण येते; क्रिकेटपटूचे धोनीला मराठीतून पत्र!
सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली धोनीने डिसेंबर २००४ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. धोनीने बांगलादेशविरुद्ध चिट्टगाव येथे भारतीय संघाची निळी जर्सी घातली. या पहिल्या सामन्यात धोनी शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. मालिकेतील दुसऱ्या वनडेत गांगुलीने धोनीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले.
वाचा- धोनी देशाला जोडतो; दिग्गजांनी अशा दिल्या शुभेच्छा!
प्रथम श्रेणी सामन्यात धोनीची ओळख स्फोटक फलंदाज अशी होती. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर धोनीला प्रभाव टाकता आला नव्हता. पण जेव्हा गांगुलीने त्याला संधी दिली, तेव्हा त्याचा फायदा घेत धोनीने १२३ चेंडूत १४८ धावा ठोकल्या. यामुळे भारतीय संघाने ३०० धावांचा टप्पा देखील गाठला. या शतकासह धोनीने टीम इंडियामध्ये जागा पक्की केली. ही धोनीची पाचवी वनडे होती.
२००५ साली श्रीलंकेने जयपूर वनडेत भारताला २९९ धावाचे टार्गेट दिले होते. या सामन्यात धोनीला पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. ५० षटक विकेटकिपिंग केल्यानंतर तो पुन्हा फलंदाजीला आला आणि अखेरपर्यंत बॅटिंग केली. धोनीने लंकेविरुद्ध १८३ धावा केल्या. वनडेतील ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.
वाचा- भारतीय संघातील क्रमांक ७ची जर्सी धोनीली अशी मिळाली!
आयसीसीने २००७ साली पहिल्या टी-२० वर्ल्ड कपचे आयोजन केले. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथमच मैदानात उतरला होता. भारताने या स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली आणि पाकिस्तानचा पराभव करत विजेतेपद मिळवले.
२०११ साली भारतात झालेल्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पुन्हा एकदा अंतिम फेरीत धडक मारली. मुंबईत झालेल्या फायनल मॅचमध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव करत विजेतेपद मिळवले. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या संघाने घरच्या मैदानावर विजेतेपद मिळवले. या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाल्यानंतर धोनीने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सचिन आणि सेहवाग ही सलामीची जोडी लवकर बाद झाली. त्यानंतर विराट बाद झाल्यानंतर धोनी स्वत: मैदानात उतरला. या सामन्यात धोनीने नाबाद ९१ धावांची खेळी केली.
वाचा- Happy Birthday Dhoni: धोनीसाठी काहीही; कोणी जीव देण्यास तयार तर कोणी...
२०१३ साली धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत झालेल्या कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी केली. धोनीने २२४ धावा केल्या आणि भारताने हा सामना ८ विकेटनी जिंकला.
वाचा- लाइटहाऊस पाहिलं की तुझी आठवण येते; क्रिकेटपटूचे धोनीला मराठीतून पत्र!
सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली धोनीने डिसेंबर २००४ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. धोनीने बांगलादेशविरुद्ध चिट्टगाव येथे भारतीय संघाची निळी जर्सी घातली. या पहिल्या सामन्यात धोनी शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. मालिकेतील दुसऱ्या वनडेत गांगुलीने धोनीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले.
वाचा- धोनी देशाला जोडतो; दिग्गजांनी अशा दिल्या शुभेच्छा!
प्रथम श्रेणी सामन्यात धोनीची ओळख स्फोटक फलंदाज अशी होती. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर धोनीला प्रभाव टाकता आला नव्हता. पण जेव्हा गांगुलीने त्याला संधी दिली, तेव्हा त्याचा फायदा घेत धोनीने १२३ चेंडूत १४८ धावा ठोकल्या. यामुळे भारतीय संघाने ३०० धावांचा टप्पा देखील गाठला. या शतकासह धोनीने टीम इंडियामध्ये जागा पक्की केली. ही धोनीची पाचवी वनडे होती.
२००५ साली श्रीलंकेने जयपूर वनडेत भारताला २९९ धावाचे टार्गेट दिले होते. या सामन्यात धोनीला पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. ५० षटक विकेटकिपिंग केल्यानंतर तो पुन्हा फलंदाजीला आला आणि अखेरपर्यंत बॅटिंग केली. धोनीने लंकेविरुद्ध १८३ धावा केल्या. वनडेतील ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.
वाचा- भारतीय संघातील क्रमांक ७ची जर्सी धोनीली अशी मिळाली!
आयसीसीने २००७ साली पहिल्या टी-२० वर्ल्ड कपचे आयोजन केले. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथमच मैदानात उतरला होता. भारताने या स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली आणि पाकिस्तानचा पराभव करत विजेतेपद मिळवले.
२०११ साली भारतात झालेल्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पुन्हा एकदा अंतिम फेरीत धडक मारली. मुंबईत झालेल्या फायनल मॅचमध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव करत विजेतेपद मिळवले. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या संघाने घरच्या मैदानावर विजेतेपद मिळवले. या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाल्यानंतर धोनीने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सचिन आणि सेहवाग ही सलामीची जोडी लवकर बाद झाली. त्यानंतर विराट बाद झाल्यानंतर धोनी स्वत: मैदानात उतरला. या सामन्यात धोनीने नाबाद ९१ धावांची खेळी केली.
वाचा- Happy Birthday Dhoni: धोनीसाठी काहीही; कोणी जीव देण्यास तयार तर कोणी...
२०१३ साली धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत झालेल्या कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी केली. धोनीने २२४ धावा केल्या आणि भारताने हा सामना ८ विकेटनी जिंकला.