अ‍ॅपशहर

'तू पुढच्या कर्णधारासाठी डोकेदुखी सोडली आहे'; कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर अश्विनची प्रतिक्रिया

विराट कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडून सरवांना एकच धक्का दिला. कोहलीच्या कर्णधारपदाच्या काळात भारताला घरच्या भूमीवर सामने जिंकून देण्यात आर.अश्विनने मोठी भूमिका बजावली होती.

guest Ashish-Narayan-Kadam | Lipi 17 Jan 2022, 9:12 am
मुंबई: भारताचा प्रमुख फिरकीपटू रविचंद्रन अश्विन मैदानातील आणि मैदानाबाहेरील खेळीमुळेही ओळखला जातो. शनिवारी (१५ जानेवारी) संध्याकाळी विराट कोहलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. कोहलीच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. अश्विनही कोहलीच्या या निर्णयामुळे आश्चर्यचकित झाला होता. यावर भाष्य करताना अश्विनने ट्विट करत कोहलीचे कौतुक केले आणि त्याच्या एकूण वाटचालीचे कौतुक केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम your legacy will stand for kind of benchmarks you have set says ravi ashwin after virat kohli resign
'तू पुढच्या कर्णधारासाठी डोकेदुखी सोडली आहे'; कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर अश्विनची प्रतिक्रिया


वाचा- विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर आली रोहित शर्माची प्रतिक्रिया; शेअर केला...


अश्विनने ट्विटरवरून कोहलीबाबतच्या आपल्या ट्विटमध्ये लिहले आहे की, 'क्रिकेटमध्ये कर्णधारांबद्दल नेहमी त्यांच्या विक्रमांबद्दल आणि त्यांनी कोणत्या प्रकारचे विजय मिळवून दिले, याबद्दल बोलले जाईल, पण कर्णधार म्हणून तुझा वारसा तू सेट केलेल्या बेंचमार्कमुळे लक्षात राहील. असेही लोक असतील, जे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका इत्यादी ठिकाणी मिळविलेल्या विजयांबद्दल बोलतील.'

वाचा- टीम इंडिया कधीच कोणाचे उधार ठेवत नाही; ४८ तासात द.आफ्रिकेचा हिशोब चुकता केला


त्यानंतर कोहलीने कसोटीत यश मिळविण्यासाठी तयार केलेला पाया आणि पुढच्या कर्णधारासाठी त्याने मागे सोडलेली 'डोकेदुखी' याबद्दलही अश्विन बोलला. त्याने लिहिले की, 'विजय हा फक्त एक परिणाम आहे आणि चांगल्या पिकासाठी बियाणे चांगले पेरले जाते. तू हेच बी पेरण्यात यशस्वी ठरला. तू स्वतःसाठी ज्या प्रकारचे स्टँडर्ड सेट केली आहेत आणि आम्हाला तशाच प्रकारच्या अपेक्षा होत्या. खूप छान विराट कोहली. तू तुझ्या उत्तराधिकार्‍यांसाठी डोकेदुखी ठेवून गेला आहे आणि हेच तुझ्या कर्णधारपदाचे वैशिष्ट्य आहे. 'आपण एवढ्या उंचीवर जागा सोडली पाहिजे की, भविष्य तिथून आणखी उंचावर नेऊ शकेल.'

वाचा- ऑस्ट्रेलियन न्यायालयाने जोकोविच अपील फेटाळली; इतक्या वर्षाची बंदी



विराटच्या नेतृत्वाखाली अश्विनची जबरदस्त कामगिरी
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली कसोटी गोलंदाज म्हणून अश्विनची कामगिरी सुधारली आहे. अश्विनने विराटच्या नेतृत्वाखाली ५५ सामन्यात २२.१३ च्या सरासरीने २९३ विकेट घेतल्या आहेत. या काळात त्याने २१ वेळा पाच बळी घेण्याचा पराक्रम केला आहे.

महत्वाचे लेख