अ‍ॅपशहर

भारताकडे सध्या सर्वात परिपूर्ण वेगवान गोलंदाजी!

भारतीय संघाकडे सध्या आजवरची सर्वात संतुलित आणि परिपूर्ण वेगवान गोलंदाजी असून हेच इंग्लंड दौऱ्यातील आपले बलस्थान असेल, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jun 2018, 10:56 pm
नवी दिल्ली :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sachin


भारतीय संघाकडे सध्या आजवरची सर्वात संतुलित आणि परिपूर्ण वेगवान गोलंदाजी असून हेच इंग्लंड दौऱ्यातील आपले बलस्थान असेल, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.

टीम इंडिया जवळपास तीन महिने ब्रिटन दौऱ्यावर असणार आहे. २७ जून रोजी आयर्लंडविरुद्ध टी-२० सामन्याने या दौऱ्याला सुरुवात होत असली तरी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराटसेनेचा खरा कस लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सचिनशी संवाद साधला असता त्याने भारतीय संघाच्या सध्याच्या वेगवान गोलंदाजीची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

खरंतर सचिनच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला कपिल देव आणि मनोज प्रभाकर असे दिग्गज गोलंदाज भारतीय संघात होते. त्यानंतर जवागल श्रीनाथ आणि झहीर खान भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा वाहत होते. असे असताना सचिनने सध्याची भारताची वेगवान गोलंदाजी सर्वात परिपूर्ण असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.

भारताला याआधी काही चांगले वेगवान गोलंदाज मिळाले हे मान्य असले तरी आज जे वैविध्य आपल्याकडे आहे ते याआधी कधीही नव्हते. भुवनेश्वर कुमार स्विंगचा प्रभावी मारा करतो. इशांत शर्मा उंचपुरा गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराहचा मारा अचूक आहे आणि उमेश यादव खऱ्या अर्थाने वेगवान गोलंदाज आहे, असे माझे मत असून या वैविध्यामुळेच आपली बाजू इंग्लंड दौऱ्यात वरचढ असल्याचे सचिन म्हणाला.

सचिनने हार्दिक पंड्या आणि भुवीच्या अष्टपैलू कामगिरीचेही कौतुक केले. हार्दिकने आपले संघातील स्थान बळकट केले आहेच मात्र भुवीच्या कामगिरीमुळे खऱ्या अर्थाने संघ संतुलित झाला आहे, असे मतही सचिनने नोंदवले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज