विजय टागोर । मुंबई मिरर
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे याची निवड होण्यात भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कुंबळेची निवड करून रवी शास्त्री यांची ‘विकेट’ काढण्याची गांगुलीची रणनीती होती, असं आता समोर आलं आहे.
सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुलीला गेल्या निवडणुकीत रवी शास्त्री यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळं शास्त्रींना प्रशिक्षपदाची दुसरी इनिंग मिळू नये यासाठी गांगुलीनं जोरदार फिल्डिंग लावली होती. बीसीसीआयच्या कारभारात सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या समितीचे अध्यक्ष न्या. लोढा यांचीही गांगुलीच्या या प्रयत्नांना अप्रत्यक्ष साथ लाभली आणि शास्त्रींची विकेट गेली.
रवी शास्त्री यांच्या १८ महिन्यांच्या कारकिर्दीत भारतीय संघ कसोटीतील पहिल्या क्रमांकाचा संघ ठरला. एकदिवसीय व टी-२० प्रकारातही दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. त्यांच्याच काळात भारतीय संघ एकदिवसीय व टी-२० विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठू शकला. इतकंच नव्हे तर, घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला दिलेली मात, आशिया कप आणि श्रीलंकेला विरुद्धचा मालिका विजय यामुळे शास्त्रींना पुन्हा सहज संधी मिळेल अशी शक्यता होती. मात्र, रवी शास्त्री यांना गांगुलीशी जुळवून घेता आलं नाही. त्याचा फटका त्यांना बसला.
गांगुली आणि शास्त्री यांच्यात फारसे सलोख्याचे संबंध कधीच नव्हते. गांगुलीच्या आग्रहामुळंच क्रिकेट सल्लागार समितीची बैठक मुंबईऐवजी कोलकात्यात घेण्यात आली. त्यानंतरही दोन दिवस आधी रवी शास्त्रींनी समितीसमोर सादरीकरण केले. रवी शास्त्री यांची मुलाखत सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण व संजय जगदाळे यांनी घेतली. त्यावेळी पुस्तक प्रकाशनाचं कारण देत गांगुली तिथं उपस्थित नव्हता.
कुंबळे आणि शास्त्री यांच्या निवडीवरून सल्लागार समितीत एकमत होत नव्हते. खरंतर पात्रता फेरीसाठी निवडण्यात आलेल्या २१ अर्जांमध्ये कुंबळेचा अर्जच नव्हता. प्रशिक्षकपदाचा अनुभव नसल्यानं त्याचा अर्ज बाजूला ठेवण्यात आला होता. मात्र, गांगुलीनं कुंबळेचं भारतीय संघासाठीचं योगदान आणि खेळातील कौशल्याची वकिली करत त्याची बाजू लावून धरली. अखेर कुंबळेचा अर्ज निवडण्यात आला. त्यानंतर सचिन तेंडुलकर, व्ही.व्ही. एस. लक्ष्मण, सौरव गांगुली यांच्या समितीनं कुंबळेचे नाव निश्चित केलं.
सध्या सुट्टीसाठी बँकॉकमध्य असलेल्या रवी शास्त्री यांनी कुंबळेच्या निवडीवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, १८ महिन्यांचा प्रशिक्षकपदाचा अनुभव आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील सुवर्णकाळ असल्याचे ते म्हणाले.
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे याची निवड होण्यात भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कुंबळेची निवड करून रवी शास्त्री यांची ‘विकेट’ काढण्याची गांगुलीची रणनीती होती, असं आता समोर आलं आहे.
सध्या बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुलीला गेल्या निवडणुकीत रवी शास्त्री यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळं शास्त्रींना प्रशिक्षपदाची दुसरी इनिंग मिळू नये यासाठी गांगुलीनं जोरदार फिल्डिंग लावली होती. बीसीसीआयच्या कारभारात सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं नेमलेल्या समितीचे अध्यक्ष न्या. लोढा यांचीही गांगुलीच्या या प्रयत्नांना अप्रत्यक्ष साथ लाभली आणि शास्त्रींची विकेट गेली.
रवी शास्त्री यांच्या १८ महिन्यांच्या कारकिर्दीत भारतीय संघ कसोटीतील पहिल्या क्रमांकाचा संघ ठरला. एकदिवसीय व टी-२० प्रकारातही दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. त्यांच्याच काळात भारतीय संघ एकदिवसीय व टी-२० विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठू शकला. इतकंच नव्हे तर, घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला दिलेली मात, आशिया कप आणि श्रीलंकेला विरुद्धचा मालिका विजय यामुळे शास्त्रींना पुन्हा सहज संधी मिळेल अशी शक्यता होती. मात्र, रवी शास्त्री यांना गांगुलीशी जुळवून घेता आलं नाही. त्याचा फटका त्यांना बसला.
गांगुली आणि शास्त्री यांच्यात फारसे सलोख्याचे संबंध कधीच नव्हते. गांगुलीच्या आग्रहामुळंच क्रिकेट सल्लागार समितीची बैठक मुंबईऐवजी कोलकात्यात घेण्यात आली. त्यानंतरही दोन दिवस आधी रवी शास्त्रींनी समितीसमोर सादरीकरण केले. रवी शास्त्री यांची मुलाखत सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण व संजय जगदाळे यांनी घेतली. त्यावेळी पुस्तक प्रकाशनाचं कारण देत गांगुली तिथं उपस्थित नव्हता.
कुंबळे आणि शास्त्री यांच्या निवडीवरून सल्लागार समितीत एकमत होत नव्हते. खरंतर पात्रता फेरीसाठी निवडण्यात आलेल्या २१ अर्जांमध्ये कुंबळेचा अर्जच नव्हता. प्रशिक्षकपदाचा अनुभव नसल्यानं त्याचा अर्ज बाजूला ठेवण्यात आला होता. मात्र, गांगुलीनं कुंबळेचं भारतीय संघासाठीचं योगदान आणि खेळातील कौशल्याची वकिली करत त्याची बाजू लावून धरली. अखेर कुंबळेचा अर्ज निवडण्यात आला. त्यानंतर सचिन तेंडुलकर, व्ही.व्ही. एस. लक्ष्मण, सौरव गांगुली यांच्या समितीनं कुंबळेचे नाव निश्चित केलं.
सध्या सुट्टीसाठी बँकॉकमध्य असलेल्या रवी शास्त्री यांनी कुंबळेच्या निवडीवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, १८ महिन्यांचा प्रशिक्षकपदाचा अनुभव आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील सुवर्णकाळ असल्याचे ते म्हणाले.