अ‍ॅपशहर

धोनीवर टीका कशासाठी ?: डीन जोन्स

पहिला वनडे सामना आम्ही कसा जिंकलो ? जेसन बेहरेनडॉर्फ आणि जे रिचर्डसन यांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर केला. त्यामुळे भारत ४ बाद ३ अशा वाईट अवस्थेत होता. सामना त्यांनी तेव्हाच गमावला होता. पण त्यानंतर महेंद्रसिंग धोनीवर किती टीका झाली आणि प्रसारमाध्यमांनी त्याचा पिच्छा पुरविला याची गणतीच नाही.

महाराष्ट्र टाइम्स 14 Jan 2019, 11:43 pm
पहिला वनडे सामना आम्ही कसा जिंकलो ? जेसन बेहरेनडॉर्फ आणि जे रिचर्डसन यांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर वापर केला. त्यामुळे भारत ४ बाद ३ अशा वाईट अवस्थेत होता. सामना त्यांनी तेव्हाच गमावला होता. पण त्यानंतर महेंद्रसिंग धोनीवर किती टीका झाली आणि प्रसारमाध्यमांनी त्याचा पिच्छा पुरविला याची गणतीच नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dean-jones


एखादा संघ ४ बाद ३ अशा अवस्थेत असतो तेव्हा नेमकी काय परिस्थिती असते हे लोकांना माहीत असते का ? मुख्य म्हणजे अशा परिस्थितीत पडझड रोखावी लागते, तेच धोनीने केले. शिवाय, पायचीतचा निर्णय त्याच्याविरुद्ध गेला हे धक्कादायक होते. शेवटच्या सहा षटकांमध्ये ऑस्ट्रेलियनही चिंताग्रस्त होते. धोनीबरोबरच टीका होत होती ती रोहितवर. तो तंदुरुस्त नव्हता असे लोकांचे म्हणणे होते. भारतीय चाहते किती कठोर आहेत !

अर्थात, ऑस्ट्रेलियाची कामगिरी त्यामुळे खुजी ठरत नाही. रिचर्डसनने वेगवान गोलंदाजी केली. त्याने रिव्हर्स स्विंगचा उत्तम वापर केला. फलंदाजीतही त्याने छाप पाडली. स्टार्कची जागा घेण्यास तो समर्थ आहे, हेच दिसून आले. पीटर हँड्सकॉम्बचे कौतुक करावे लागेल. त्याचे पदलालित्य इतके उत्तम होते की, पांढरा चेंडू असो की लाल चेरी पदलालित्य अचूक असेल तर काहीही फरक पडत नाही.

विराटला ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीला रोखावे लागेल. मधली फळी फिरकी गोलंदाजीचा उत्कृष्ट सामना करते. तरीही मला वाटते की, भारत ही मालिका जिंकू शकेल. पहिली लढत गमावल्यामुळे संघ पुढील सामन्यात त्वेषाने लढेल. एक मात्र खरे की, पूर्वीच्या ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघाप्रमाणे आताचा संघ मला दिसतो आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज