माजी पंच सायमन टॉफेल, हरीहरन यांचे मत
लंडन/मेलबर्न : मार्टिन गप्टिलने फेकलेला चेंडू बेन स्टोक्सच्या बॅटला लागून सीमापार गेल्यानंतर पंच कुमार धर्मसेना यांनी इंग्लंडला सहा धावा बहाल केल्या. त्याविषयी जोरदार चर्चा रंगली आणि धर्मसेना यांनी भयंकर चूक केल्याची प्रतिक्रिया माजी पंच सायमन टॉफेल आणि के. हरीहरन यांनी व्यक्त केली.
इंग्लंड २४२ धावांचा पाठलाग करताना त्यांना शेवटच्या षटकांत १५ धावांची गरज होती. तेव्हा स्टोक्स दुहेरी धाव घेत असताना गप्टिलने मिडविकेटवरून चेंडूफेक (ओव्हरथ्रो) केली, तो चेंडू स्टोक्सच्या बॅटला लागून सीमापार गेला. धावून काढलेल्या दोन धावा आणि हा चौकार अशा सहा धावा पंचांनी इंग्लंडला दिल्या. परिणामी, त्यांना २ चेंडूंत ३ धावा करण्याचे लक्ष्य होते. अखेर त्यावेळी लढत बरोबरीत सुटली आणि सुपर ओव्हरवर निर्णय घेण्याचे ठरले.
त्यावेळी श्रीलंकेचे कुमार धर्मसेना आणि दक्षिण आफ्रिकेचे मारियस इरॅसमस हे पंच होते. आयसीसीचा सर्वोत्तम पंचाचा पुरस्कार पाचवेळा पटकाविणारे टॉफेल यासंदर्भात म्हणाले की, ही एक चूक होती. नेमके काय झाले हे ठरवताना पंचांनी चूक केली. त्यांनी सहा नव्हे तर पाचच धावा द्यायला हव्या होत्या.
टॉफेल यांच्याच सुरात सूर मिसळून भारताचे माजी पंच के. हरीहरन म्हणाले की, कुमार धर्मसेना यांनी न्यूझीलंडकडून वर्ल्डकप हिसकावून घेतला. त्यांनी सहा नव्हे तर पाचच धावा द्यायला हव्या होत्या.
आयसीसीने मात्र या सगळ्या प्रकारावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आयसीसीने म्हटले आहे की, मैदानावरील पंच हे त्या परिस्थितीत नियमांचा अर्थ लावून निर्णय घेत असतात. आम्ही या निर्णयांबद्दल मत व्यक्त करू शकत नाही.
आयसीसीच्या १९.८ या ओव्हरथ्रोच्या नियमानुसार 'ओव्हरथ्रोमुळे किंवा क्षेत्ररक्षकाच्या कृतीमुळे जर चौकार गेला तर फलंदाजांनी पूर्ण केलेली धाव आणि पुढील धाव घेताना थ्रो करण्यापूर्वी एकमेकांना ओलांडले असेल तर ती धावही विचारात घेतली जाईल.' पण गप्टिलने थ्रो केला तेव्हा पंचांनी हे पाहायला हवे होते की, फलंदाजांनी (स्टोक्स आणि आदिल रशिद) एकमेकांना ओलांडले आहे अथवा नाही. पण जेव्हा रिप्ले पाहिला गेला तेव्हा गप्टिलने थ्रो करताना या दोन्ही फलंदाजांनी नुकतेच क्रीझ सोडले होते आणि ते दुसरी धाव घेण्यासाठी धावू लागले होते.
त्याबद्दल हरीहरन म्हणतात की, ही दुसरी धाव मोजता कामा नये. लेग अंपायर इरॅसमस यांनी तिसऱ्या पंचांशी यासंदर्भात चर्चा करायला हवी होती आणि निर्णय बदलायला हवा होता. त्यामुळे स्टोक्स पुढच्या चेंडूचा सामना करताना स्ट्राइकवर आला नसता.
टॉफेल यांनी पंचांची एकीकडे बाजूही घेतली. ते म्हणाले की, सामना अशा रंगतदार स्थितीत होता की, त्यांना असे वाटले असेल की, थ्रो केला तेव्हा या फलंदाजांनी एकमेकांना ओलांडले असेल. पंच एकाचवेळी फलंदाजांना एकमेकांना ओलांडताना किंवा गप्टिलला चेंडू उचलताना आणि फेकताना पाहणे अशक्यच होते.
मटा भूमिका
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रिकेट वर्ल्डकप अंतिम लढतीत आयसीसीच्या काही नियमांवर बोट ठेवण्यात आले आहे. चौकारांच्या संख्येच्या आधारे विजेता घोषित करणे आणि ओव्हरथ्रोचा नियम दुर्लक्षित करणे हे दुर्दैवी आणि अन्यायकारक होते. त्यामुळे बरोबरीत असलेल्या संघांपैकी एकावर अन्याय झाल्याची भावना चाहत्यांमध्ये बळावली. आयसीसीने याकडे गांभीर्याने पाहायला हवे.
लंडन/मेलबर्न : मार्टिन गप्टिलने फेकलेला चेंडू बेन स्टोक्सच्या बॅटला लागून सीमापार गेल्यानंतर पंच कुमार धर्मसेना यांनी इंग्लंडला सहा धावा बहाल केल्या. त्याविषयी जोरदार चर्चा रंगली आणि धर्मसेना यांनी भयंकर चूक केल्याची प्रतिक्रिया माजी पंच सायमन टॉफेल आणि के. हरीहरन यांनी व्यक्त केली.
इंग्लंड २४२ धावांचा पाठलाग करताना त्यांना शेवटच्या षटकांत १५ धावांची गरज होती. तेव्हा स्टोक्स दुहेरी धाव घेत असताना गप्टिलने मिडविकेटवरून चेंडूफेक (ओव्हरथ्रो) केली, तो चेंडू स्टोक्सच्या बॅटला लागून सीमापार गेला. धावून काढलेल्या दोन धावा आणि हा चौकार अशा सहा धावा पंचांनी इंग्लंडला दिल्या. परिणामी, त्यांना २ चेंडूंत ३ धावा करण्याचे लक्ष्य होते. अखेर त्यावेळी लढत बरोबरीत सुटली आणि सुपर ओव्हरवर निर्णय घेण्याचे ठरले.
त्यावेळी श्रीलंकेचे कुमार धर्मसेना आणि दक्षिण आफ्रिकेचे मारियस इरॅसमस हे पंच होते. आयसीसीचा सर्वोत्तम पंचाचा पुरस्कार पाचवेळा पटकाविणारे टॉफेल यासंदर्भात म्हणाले की, ही एक चूक होती. नेमके काय झाले हे ठरवताना पंचांनी चूक केली. त्यांनी सहा नव्हे तर पाचच धावा द्यायला हव्या होत्या.
टॉफेल यांच्याच सुरात सूर मिसळून भारताचे माजी पंच के. हरीहरन म्हणाले की, कुमार धर्मसेना यांनी न्यूझीलंडकडून वर्ल्डकप हिसकावून घेतला. त्यांनी सहा नव्हे तर पाचच धावा द्यायला हव्या होत्या.
आयसीसीने मात्र या सगळ्या प्रकारावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आयसीसीने म्हटले आहे की, मैदानावरील पंच हे त्या परिस्थितीत नियमांचा अर्थ लावून निर्णय घेत असतात. आम्ही या निर्णयांबद्दल मत व्यक्त करू शकत नाही.
आयसीसीच्या १९.८ या ओव्हरथ्रोच्या नियमानुसार 'ओव्हरथ्रोमुळे किंवा क्षेत्ररक्षकाच्या कृतीमुळे जर चौकार गेला तर फलंदाजांनी पूर्ण केलेली धाव आणि पुढील धाव घेताना थ्रो करण्यापूर्वी एकमेकांना ओलांडले असेल तर ती धावही विचारात घेतली जाईल.' पण गप्टिलने थ्रो केला तेव्हा पंचांनी हे पाहायला हवे होते की, फलंदाजांनी (स्टोक्स आणि आदिल रशिद) एकमेकांना ओलांडले आहे अथवा नाही. पण जेव्हा रिप्ले पाहिला गेला तेव्हा गप्टिलने थ्रो करताना या दोन्ही फलंदाजांनी नुकतेच क्रीझ सोडले होते आणि ते दुसरी धाव घेण्यासाठी धावू लागले होते.
त्याबद्दल हरीहरन म्हणतात की, ही दुसरी धाव मोजता कामा नये. लेग अंपायर इरॅसमस यांनी तिसऱ्या पंचांशी यासंदर्भात चर्चा करायला हवी होती आणि निर्णय बदलायला हवा होता. त्यामुळे स्टोक्स पुढच्या चेंडूचा सामना करताना स्ट्राइकवर आला नसता.
टॉफेल यांनी पंचांची एकीकडे बाजूही घेतली. ते म्हणाले की, सामना अशा रंगतदार स्थितीत होता की, त्यांना असे वाटले असेल की, थ्रो केला तेव्हा या फलंदाजांनी एकमेकांना ओलांडले असेल. पंच एकाचवेळी फलंदाजांना एकमेकांना ओलांडताना किंवा गप्टिलला चेंडू उचलताना आणि फेकताना पाहणे अशक्यच होते.
मटा भूमिका
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रिकेट वर्ल्डकप अंतिम लढतीत आयसीसीच्या काही नियमांवर बोट ठेवण्यात आले आहे. चौकारांच्या संख्येच्या आधारे विजेता घोषित करणे आणि ओव्हरथ्रोचा नियम दुर्लक्षित करणे हे दुर्दैवी आणि अन्यायकारक होते. त्यामुळे बरोबरीत असलेल्या संघांपैकी एकावर अन्याय झाल्याची भावना चाहत्यांमध्ये बळावली. आयसीसीने याकडे गांभीर्याने पाहायला हवे.