अ‍ॅपशहर

‘स्ट्राइक बदलण्याची क्षमता गमावली होती’

भारताच्या वन-डे क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावून टीकाकारांची तोंडे बंद केली असली, तरी या सामन्यानंतर आपल्या फलंदाजीतील त्रुटी प्रांजळपणे मान्य केल्या. गेल्या काही काळात मी खेळपट्टीवर स्ट्राइक अदलाबदल करण्याची क्षमता गमावत चाललो होतो, असे धोनीने सांगितले.

Maharashtra Times 25 Oct 2016, 4:00 am
मोहली : भारताच्या वन-डे क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावून टीकाकारांची तोंडे बंद केली असली, तरी या सामन्यानंतर आपल्या फलंदाजीतील त्रुटी प्रांजळपणे मान्य केल्या. गेल्या काही काळात मी खेळपट्टीवर स्ट्राइक अदलाबदल करण्याची क्षमता गमावत चाललो होतो, असे धोनीने सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sports/cricket/dhoni
‘स्ट्राइक बदलण्याची क्षमता गमावली होती’


रविवारी झालेल्या सामन्यात धोनीने ९१ चेंडूंमध्ये ८० धावा करतानाच विराट कोहलीसोबत १५१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही रचली. या भागीदारीमुळेच भारताने हा सामना ७ विकेट्सनी जिंकून मालिकेत २-१ ने आघाडी घेतली. या मालिकेत धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येत आहे. याबाबत बोलताना धोनी म्हणाला, ‘मागील बराच काळ मी खालच्या क्रमांकावर फलंदाजीस येत होतो. त्यामुळे काही प्रमाणात मी स्ट्राइक अदलाबदल करण्याची क्षमताही गमावली होती. त्यामुळेच मी आता वरच्या स्थानावर फलंदाजीस येण्याचा निर्णय घेतला असून अखेरच्या षटकांची जबाबदारी अन्य फलंदाजांवर सोपवली आहे. मी आता पुन्हा मोठे फटके मारण्याचा विचार करू शकतो. एकदा तुम्ही १५-२० धावा केल्या की अधिक खुलेपणाने खेळू शकता.’ या सामन्यात कोहलीसोबत खेळण्याचाही फायदा झाल्याचेही धोनीने सांगितले. आम्ही चौकार, षटकार मारू शकतो हे आम्हाला माहित होते. त्यामुळे आम्ही एकेरी, दुहेरी धावा घेण्यावर भर दिला, असेही धोनीने नमूद केले.

भारतीय संघ कायम
नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील आगामी दोन वन-डे क्रिकेट सामन्यात भारतीय संघात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. मधल्या फळीतील डावखुरा फलंदाज सुरेश रैना आजारपणातून सावरत आहे. त्यामुळे त्याचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचाही समावेश करण्यात आलेला नाही. भारतीय संघ सध्या मालिकेत २-१ने आघाडीवर आहे. चौथी वन-डे रांची येथे २६ ऑक्टोबरला, तर विशाखापट्टणम येथे २९ ऑक्टोबरला पाचवी वन-डे होईल. भारतीय संघ : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, मनीष पांडे, केदार जाधव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जयंत यादव, अमित मिश्रा, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, उमेश यादव, मनदीपसिंग.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज