म.टा. क्रीडा प्रतिनिधी, मुंबई
रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. पण भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषविणे आता शक्य नाही. मात्र निवड समितीत काम करण्याची संधी मिळाली तर ती जबाबदारी जरूर स्वीकारेन, असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, मला प्रशिक्षक म्हणून आता काम करणे शक्य नाही. ४०-४५ वयात मला ते नक्कीच शक्य झाले असते. पण निवड समितीची जबाबदारी मला नक्की आवडेल. कारण १९ वर्षांखालील, २३ वर्षांखालील, भारत अ संघात खेळाडूंच्या कामगिरीचे निरीक्षण करणे मला नक्की आवडेल. मी जेव्हा निवड समिती अध्यक्ष झालो, तेव्हा भारतीय संघ पाचव्या क्रमांकावर होता आणि नंतर तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला. पण त्यानंतर मला हटविण्यात आले. एवढे चांगले निवड समिती सदस्य नकोत असा विचार त्यांनी केला असावा. रबरस्टॅम्प असलेले निवड समिती सदस्य नकोत. नाहीतर कर्णधार म्हणेल तोच संघ निवडावा लागतो.
...म्हणून संघात तीन यष्टीरक्षक
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची निवड झाली त्यावरून बरीच चर्चा झाली. निवड समितीच्या एकूणच दर्जावर भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर टीका करतात. त्यांच्या मते निवड समितीपुढे काही दूरदृष्टी असली पाहिजे. सर्व निवड समिती सदस्यांमध्ये एकवाक्यता असली पाहिजे. आताच्या निवड समिती सदस्यांच्या कसोटी क्रिकेट सामन्यांची बेरीज केली तर ती अवघी १० भरेल. त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभवच नाही. म्हणूनच भारतीय संघात आता तीन यष्टीरक्षक आहेत. भारतीय संघातील खेळाडू त्यांच्यापेक्षा वरचढ ठरणारच. ते सांगतील त्याप्रमाणे संघनिवड करावी लागते. आता आपण ऋषभ पंतला संघात निवडले आहे. हा संघातला तिसरा यष्टीरक्षक आहे. तीन यष्टीरक्षक घेऊन जाण्याचे नेमके कारण काय? दिनेश कार्तिकला तुम्ही संघात स्थान दिले आहे. आता पंतलाही बोलावले आहे. पण हे चौथ्या क्रमांकाचे फलंदाज नाहीत. जो कौंटी क्रिकेटमध्ये धावा करत आहे, त्या अजिंक्यचा तुम्ही विचारच करत नाहीत. यावर अधिक काय बोलावे? मला आठवते, एजबॅस्टनला कसोटी सामन्यासाठी मी गेलो होतो. त्यावेळी सरणदीपसिंग आपले निवड समिती सदस्य सामना पाहात बसले होते. तेव्हा भारताचे माजी यष्टीरक्षक फारुख इंजीनियर म्हणाले की, हे भारतीय संघाचे ब्लेझर घालून बसलेले गृहस्थ कोण? तेव्हा मी म्हटले की, हे आपले निवड समिती सदस्य आहेत. तेव्हा इंजीनियर म्हणाले की, हे भारतीय संघासाठी खेळलेले आहेत का? तेव्हा मी म्हटले की, खेळले असावेत एक-दोन कसोटी सामने.
भारत-इंग्लंड अंतिम सामना?
इंग्लंडमधील वर्ल्डकपमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना होऊ शकतो, असे भाकीत वेंगसरकर यांनी केले आहे. ते म्हणाले की, वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत भारतीय संघाची कामगिरी अप्रतिम झाली आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामन्यात खूपच दबाव होता. पण भारतीय संघ उत्तम खेळला. आता वेस्ट इंडिज, इंग्लंडविरुद्धही महत्त्वाचा सामना आहे. भारतीय संघाची वाटचाल पाहता आपण उपांत्य फेरीत पोहोचू हे नक्की. भारतासोबत इंग्लंड ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे उपांत्य फेरीत पोहोचतील असे वाटते. इंग्लंडचा संघ या घडीला मला सर्वोत्तम वाटतो. भारतीय संघाकडूनही विजेतेपदाच्या अपेक्षा आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील एक संघ विजेतेपद पटकावेल असे वाटते.
धोनी अजूनही तंदुरुस्त
धोनीच्या भवितव्याविषयी प्रश्न आल्यावर वेंगसरकर म्हणतात की, धोनी हा महान खेळाडू आहे. त्याच्या अनुभवाचा भारतीय संघाला खूप उपयोग होतो. एक माजी निवड समिती सदस्य म्हणून मला वाटते की, खेळाडू किती तंदुरुस्त आहे यावर त्याचे भवितव्य आहे. जर त्याचे वय जास्त आहे मात्र तो तंदुरुस्त असेल तर तो खेळू शकतो. शिवाय, त्याला स्वतःला कळतेच की, आपल्याला केव्हा थांबले पाहिजे. त्याचा दर्जा खाली येत असल्याचे त्याला जाणवले तर तो थांबेल.
दहशतवादी कॅम्प नको, क्रिकेटचे कॅम्प हवेत
भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या निमित्ताने उफाळलेल्या उन्मादाबद्दल वेंगसरकर म्हणाले की, भारत-पाक सामन्यादरम्यान असा उन्माद होणारच. आम्ही शारजात खेळत असताना भारतीय संघ १२५ धावांत गारद झाला होता. पण पाकिस्तानला आपण ८८ धावांत गुंडाळले होते. त्यानंतर पाकिस्तानी खेळाडू हॉटेलमधूनही बाहेर पडले नव्हते. मात्र पाकिस्तानविरुद्ध आपल्याला कामगिरी नेहमीच उंचवावी लागते, हे खरे आहे. मात्र आता पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच होत नाही. ते दुबईमध्ये क्रिकेट खेळतात. पाकिस्तानमधील क्रिकेट जवळपास संपलेले आहे. लहान मुलांसमोर कुणाचे आदर्शच नाहीत. खरे तर, पाकिस्तानने तिथले दहशतवादी कॅम्प बंद करून क्रिकेट कॅम्प सुरू केले तर तिथले क्रिकेट सुधारेल.
युवराज मोठा खेळाडू
नुकतीच निवृत्तीची घोषणा करणाऱ्या युवराजबद्दल आपुलकीच्या भावनेने वेंगसरकर म्हणतात की, युवराज हा महान खेळाडू होता. मी लहानपणापासून त्याला पाहिले आहे. पण कसोटीत तो स्थान पक्के करू शकला नाही. लाहोरला त्याने कसोटी शतक केले ते अप्रतिम होते. मात्र त्याकाळी सचिन, सेहवाग, सौरभ, राहुल द्रविड असे खेळाडू असल्यामुळे त्याला संघात स्थान अबाधित राखता आले नाही. कसोटी क्रिकेट खेळता आले असते तर त्याच्या कारकीर्दीत खूप फरक पडला असता. लहानपणी तो जेव्हा मुंबईत राहिला तेव्हा त्याला प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अंधेरीहून चर्चगेटला माझ्या अकादमीत सराव करायला येताना एकदा त्याला प्रचंड गर्दीत रेल्वेत चढायालाही मिळाले नाही. तीन गाड्या चुकल्या. नंतर मोठ्या किटबॅगमुळे त्याला दादरला बाहेर ढकलले गेले. पुन्हा पुढची रेल्वे पकडण्यासाठी दोन गाड्या सोडाव्या लागल्या. मजल दरमजल करत तो दुपारी ३च्या सरावाऐवजी ५ वाजता पोहोचला. मग त्याने आपल्याला मुंबईत राहायचे नाही, असे रडगाणे सुरू केले. पण वडील योगराज सिंग यांनी सांगितले की, क्रिकेट खेळायचे असेल तर मुंबईत राहावेच लागेल.
...तर फिरकी गोलंदाजांचे अस्तित्व संपेल
एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, फलंदाजाभोवती क्रिकेट फिरते आहे हे खरे आहे, पण लोक फलंदाजालाच पाहायला येतात. पालकांनाही आज आपल्या मुलाने फलंदाज बनावे असेच वाटते. तो जर उत्तम फिरकी गोलंदाजी करत असेल तरी ते म्हणतात की, त्याला फलंदाज बनवायचे आहे, गोलंदाज नाही. पालकांची ही मानसिकता चुकीची आहे. हे चित्र बदलण्यासाठी नियमांत बदल करावे लागेल. तरच फलंदाजांचे वर्चस्व कमी होईल. नाहीतर फिरकी गोलंदाजांचे अस्तित्वच संपून जाईल.
भारतातील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या कार्यपद्धतीवर टीका करताना ते म्हणतात की, ऑस्ट्रेलियन क्रिकेट अकादमी ही अप्रतिम आहे. त्यातून जे खेळाडू तयार होतात ते ऑस्ट्रेलियासाठी खेळतात. आपल्याकडे राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) आहे खरी पण ते खेळाडूंचे पुनर्वसन केंद्र बनले आहे. तिकडे क्रिकेट खेळले जाते का? बीसीसीआयकडे पैसा आहे पण एनसीएबद्दल गंभीर विचार झालेला नाही. या संस्थेतून खरे तर खेळाडू तयार व्हायला हवेत.
भुवनेश्वरच्या जागी शार्दूल ठाकूरला संघात घ्यायला हरकत नाही, असेही वेंगसरकर यांना वाटते. भुवनेश्वर बऱ्याचवेळा तंदुरुस्त नसतो. शार्दूल हा या घडीला उत्कृष्ट गोलंदाज आहे. तंदुरुस्त खेळाडूंना संधी मिळायला हवी.
राहुलमध्ये कर्णधार होण्याची क्षमता
कोणत्या खेळाडूत तुमची झलक दिसते या प्रश्नावर ते म्हणतात की, के.एल. राहुलमध्ये माझी झलक दिसते असे लोक म्हणतात. राहुलची खेळण्याची जी शैली आहे. त्याचे ड्राइव्ह, पुल वगैरे पाहिल्यानंतर त्याच्यात तुमची झलक दिसते असे लोक मला म्हणतात. पण सध्या पत्त्यांमधल्या जोकरप्रमाणे राहुलची स्थिती झाली आहे. खरे तर तो खूप चांगला खेळाडू आहे आणि भविष्यात भारतीय संघाचा कर्णधारही होण्याची क्षमता त्याच्यात आहे. पण त्याच्याकडे पाहिल्यानंतर तो कर्णधारपदाला लायक खेळाडू वाटतो.
यो-यो चाचणी आवश्यक
यो-यो चाचणी ही आताच्या घडीला आवश्यक आहे. त्यासाठी निश्चित केलेले निकष खेळाडूंना पाळावे लागतात. पण आमच्यावेळी ही चाचणी असती तर कदाचित १० खेळाडू बाहेर फेकले गेले असते. पण टी-२० क्रिकेटमुळे तंदुरुस्तीला महत्त्व आहे. पण यो-यो चाचणी उत्तीर्ण झाला म्हणजे तो चांगली कामगिरी मैदानावर करेल असे म्हणता येत नाही.
८३ या चित्रपटासाठी आदिनाथ कोठारे मला भेटला. त्याने माझ्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण हा चित्रपट खूप चांगला होईल, अशी अपेक्षा आहे, असेही शेवटी वेंगसरकर म्हणाले.
रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. पण भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषविणे आता शक्य नाही. मात्र निवड समितीत काम करण्याची संधी मिळाली तर ती जबाबदारी जरूर स्वीकारेन, असे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, मला प्रशिक्षक म्हणून आता काम करणे शक्य नाही. ४०-४५ वयात मला ते नक्कीच शक्य झाले असते. पण निवड समितीची जबाबदारी मला नक्की आवडेल. कारण १९ वर्षांखालील, २३ वर्षांखालील, भारत अ संघात खेळाडूंच्या कामगिरीचे निरीक्षण करणे मला नक्की आवडेल. मी जेव्हा निवड समिती अध्यक्ष झालो, तेव्हा भारतीय संघ पाचव्या क्रमांकावर होता आणि नंतर तो पहिल्या क्रमांकावर पोहोचला. पण त्यानंतर मला हटविण्यात आले. एवढे चांगले निवड समिती सदस्य नकोत असा विचार त्यांनी केला असावा. रबरस्टॅम्प असलेले निवड समिती सदस्य नकोत. नाहीतर कर्णधार म्हणेल तोच संघ निवडावा लागतो.
...म्हणून संघात तीन यष्टीरक्षक
इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची निवड झाली त्यावरून बरीच चर्चा झाली. निवड समितीच्या एकूणच दर्जावर भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर टीका करतात. त्यांच्या मते निवड समितीपुढे काही दूरदृष्टी असली पाहिजे. सर्व निवड समिती सदस्यांमध्ये एकवाक्यता असली पाहिजे. आताच्या निवड समिती सदस्यांच्या कसोटी क्रिकेट सामन्यांची बेरीज केली तर ती अवघी १० भरेल. त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभवच नाही. म्हणूनच भारतीय संघात आता तीन यष्टीरक्षक आहेत. भारतीय संघातील खेळाडू त्यांच्यापेक्षा वरचढ ठरणारच. ते सांगतील त्याप्रमाणे संघनिवड करावी लागते. आता आपण ऋषभ पंतला संघात निवडले आहे. हा संघातला तिसरा यष्टीरक्षक आहे. तीन यष्टीरक्षक घेऊन जाण्याचे नेमके कारण काय? दिनेश कार्तिकला तुम्ही संघात स्थान दिले आहे. आता पंतलाही बोलावले आहे. पण हे चौथ्या क्रमांकाचे फलंदाज नाहीत. जो कौंटी क्रिकेटमध्ये धावा करत आहे, त्या अजिंक्यचा तुम्ही विचारच करत नाहीत. यावर अधिक काय बोलावे? मला आठवते, एजबॅस्टनला कसोटी सामन्यासाठी मी गेलो होतो. त्यावेळी सरणदीपसिंग आपले निवड समिती सदस्य सामना पाहात बसले होते. तेव्हा भारताचे माजी यष्टीरक्षक फारुख इंजीनियर म्हणाले की, हे भारतीय संघाचे ब्लेझर घालून बसलेले गृहस्थ कोण? तेव्हा मी म्हटले की, हे आपले निवड समिती सदस्य आहेत. तेव्हा इंजीनियर म्हणाले की, हे भारतीय संघासाठी खेळलेले आहेत का? तेव्हा मी म्हटले की, खेळले असावेत एक-दोन कसोटी सामने.
भारत-इंग्लंड अंतिम सामना?
इंग्लंडमधील वर्ल्डकपमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात अंतिम सामना होऊ शकतो, असे भाकीत वेंगसरकर यांनी केले आहे. ते म्हणाले की, वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत भारतीय संघाची कामगिरी अप्रतिम झाली आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामन्यात खूपच दबाव होता. पण भारतीय संघ उत्तम खेळला. आता वेस्ट इंडिज, इंग्लंडविरुद्धही महत्त्वाचा सामना आहे. भारतीय संघाची वाटचाल पाहता आपण उपांत्य फेरीत पोहोचू हे नक्की. भारतासोबत इंग्लंड ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे उपांत्य फेरीत पोहोचतील असे वाटते. इंग्लंडचा संघ या घडीला मला सर्वोत्तम वाटतो. भारतीय संघाकडूनही विजेतेपदाच्या अपेक्षा आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील एक संघ विजेतेपद पटकावेल असे वाटते.
धोनी अजूनही तंदुरुस्त
धोनीच्या भवितव्याविषयी प्रश्न आल्यावर वेंगसरकर म्हणतात की, धोनी हा महान खेळाडू आहे. त्याच्या अनुभवाचा भारतीय संघाला खूप उपयोग होतो. एक माजी निवड समिती सदस्य म्हणून मला वाटते की, खेळाडू किती तंदुरुस्त आहे यावर त्याचे भवितव्य आहे. जर त्याचे वय जास्त आहे मात्र तो तंदुरुस्त असेल तर तो खेळू शकतो. शिवाय, त्याला स्वतःला कळतेच की, आपल्याला केव्हा थांबले पाहिजे. त्याचा दर्जा खाली येत असल्याचे त्याला जाणवले तर तो थांबेल.
दहशतवादी कॅम्प नको, क्रिकेटचे कॅम्प हवेत
भारत आणि पाकिस्तान सामन्याच्या निमित्ताने उफाळलेल्या उन्मादाबद्दल वेंगसरकर म्हणाले की, भारत-पाक सामन्यादरम्यान असा उन्माद होणारच. आम्ही शारजात खेळत असताना भारतीय संघ १२५ धावांत गारद झाला होता. पण पाकिस्तानला आपण ८८ धावांत गुंडाळले होते. त्यानंतर पाकिस्तानी खेळाडू हॉटेलमधूनही बाहेर पडले नव्हते. मात्र पाकिस्तानविरुद्ध आपल्याला कामगिरी नेहमीच उंचवावी लागते, हे खरे आहे. मात्र आता पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटच होत नाही. ते दुबईमध्ये क्रिकेट खेळतात. पाकिस्तानमधील क्रिकेट जवळपास संपलेले आहे. लहान मुलांसमोर कुणाचे आदर्शच नाहीत. खरे तर, पाकिस्तानने तिथले दहशतवादी कॅम्प बंद करून क्रिकेट कॅम्प सुरू केले तर तिथले क्रिकेट सुधारेल.
युवराज मोठा खेळाडू
नुकतीच निवृत्तीची घोषणा करणाऱ्या युवराजबद्दल आपुलकीच्या भावनेने वेंगसरकर म्हणतात की, युवराज हा महान खेळाडू होता. मी लहानपणापासून त्याला पाहिले आहे. पण कसोटीत तो स्थान पक्के करू शकला नाही. लाहोरला त्याने कसोटी शतक केले ते अप्रतिम होते. मात्र त्याकाळी सचिन, सेहवाग, सौरभ, राहुल द्रविड असे खेळाडू असल्यामुळे त्याला संघात स्थान अबाधित राखता आले नाही. कसोटी क्रिकेट खेळता आले असते तर त्याच्या कारकीर्दीत खूप फरक पडला असता. लहानपणी तो जेव्हा मुंबईत राहिला तेव्हा त्याला प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अंधेरीहून चर्चगेटला माझ्या अकादमीत सराव करायला येताना एकदा त्याला प्रचंड गर्दीत रेल्वेत चढायालाही मिळाले नाही. तीन गाड्या चुकल्या. नंतर मोठ्या किटबॅगमुळे त्याला दादरला बाहेर ढकलले गेले. पुन्हा पुढची रेल्वे पकडण्यासाठी दोन गाड्या सोडाव्या लागल्या. मजल दरमजल करत तो दुपारी ३च्या सरावाऐवजी ५ वाजता पोहोचला. मग त्याने आपल्याला मुंबईत राहायचे नाही, असे रडगाणे सुरू केले. पण वडील योगराज सिंग यांनी सांगितले की, क्रिकेट खेळायचे असेल तर मुंबईत राहावेच लागेल.
...तर फिरकी गोलंदाजांचे अस्तित्व संपेल
एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, फलंदाजाभोवती क्रिकेट फिरते आहे हे खरे आहे, पण लोक फलंदाजालाच पाहायला येतात. पालकांनाही आज आपल्या मुलाने फलंदाज बनावे असेच वाटते. तो जर उत्तम फिरकी गोलंदाजी करत असेल तरी ते म्हणतात की, त्याला फलंदाज बनवायचे आहे, गोलंदाज नाही. पालकांची ही मानसिकता चुकीची आहे. हे चित्र बदलण्यासाठी नियमांत बदल करावे लागेल. तरच फलंदाजांचे वर्चस्व कमी होईल. नाहीतर फिरकी गोलंदाजांचे अस्तित्वच संपून जाईल.
भारतातील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या कार्यपद्धतीवर टीका करताना ते म्हणतात की, ऑस्ट्रेलियन क्रिकेट अकादमी ही अप्रतिम आहे. त्यातून जे खेळाडू तयार होतात ते ऑस्ट्रेलियासाठी खेळतात. आपल्याकडे राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) आहे खरी पण ते खेळाडूंचे पुनर्वसन केंद्र बनले आहे. तिकडे क्रिकेट खेळले जाते का? बीसीसीआयकडे पैसा आहे पण एनसीएबद्दल गंभीर विचार झालेला नाही. या संस्थेतून खरे तर खेळाडू तयार व्हायला हवेत.
भुवनेश्वरच्या जागी शार्दूल ठाकूरला संघात घ्यायला हरकत नाही, असेही वेंगसरकर यांना वाटते. भुवनेश्वर बऱ्याचवेळा तंदुरुस्त नसतो. शार्दूल हा या घडीला उत्कृष्ट गोलंदाज आहे. तंदुरुस्त खेळाडूंना संधी मिळायला हवी.
राहुलमध्ये कर्णधार होण्याची क्षमता
कोणत्या खेळाडूत तुमची झलक दिसते या प्रश्नावर ते म्हणतात की, के.एल. राहुलमध्ये माझी झलक दिसते असे लोक म्हणतात. राहुलची खेळण्याची जी शैली आहे. त्याचे ड्राइव्ह, पुल वगैरे पाहिल्यानंतर त्याच्यात तुमची झलक दिसते असे लोक मला म्हणतात. पण सध्या पत्त्यांमधल्या जोकरप्रमाणे राहुलची स्थिती झाली आहे. खरे तर तो खूप चांगला खेळाडू आहे आणि भविष्यात भारतीय संघाचा कर्णधारही होण्याची क्षमता त्याच्यात आहे. पण त्याच्याकडे पाहिल्यानंतर तो कर्णधारपदाला लायक खेळाडू वाटतो.
यो-यो चाचणी आवश्यक
यो-यो चाचणी ही आताच्या घडीला आवश्यक आहे. त्यासाठी निश्चित केलेले निकष खेळाडूंना पाळावे लागतात. पण आमच्यावेळी ही चाचणी असती तर कदाचित १० खेळाडू बाहेर फेकले गेले असते. पण टी-२० क्रिकेटमुळे तंदुरुस्तीला महत्त्व आहे. पण यो-यो चाचणी उत्तीर्ण झाला म्हणजे तो चांगली कामगिरी मैदानावर करेल असे म्हणता येत नाही.
८३ या चित्रपटासाठी आदिनाथ कोठारे मला भेटला. त्याने माझ्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण हा चित्रपट खूप चांगला होईल, अशी अपेक्षा आहे, असेही शेवटी वेंगसरकर म्हणाले.