लंडन:
लॉर्ड्स स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला नामुष्कीकारक पराभावाचा सामना करावा लागला. इंग्लंडने पहिल्या डावात २८९ धावांची बलाढ्य आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावातही टीम इंडियाची पडझड झाली. त्यामुळे इंग्लंडने टीम इंडियाला एक डाव १५९ धावांनी पराभूत केले. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने टीम इंडियावर २-० ने आघाडी घेतली आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. अत्यंत डळमळीत सुरुवात झालेल्या टीम इंडियाची ३५.२ षटकामध्येच संपूर्ण वाताहात झाली. टीम इंडियाचा पहिला डाव केवळ १०७ धावांत आटोपला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या इंग्लंडने ७ गडी गमावत ३९६ धावांचा डोंगर रचून पहिला डाव घोषित केला. पहिला डाव घोषित करताना इंग्लंडने टीम इंडियावर २८९ धावांची आघाडी घेतली होती. इंग्लंडचा ख्रिस वोक्स १७७ चेंडूंमध्ये २१ चौकारांसह १३७ धावांवर नाबाद राहिला. करनने ५ चौकार व एका षटकारासह ४९ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या. भारतातर्फे महंमद शमी व हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. मात्र या २८९ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर अक्षरश: नांगी टाकली. टीम इंडियाचा संपूर्ण संघ १३० धावांवर बाद झाला.
२८९ धावांचा पाठलाग करताना अँडरसनच्या गोलंदाजीवर मुरली विजय सलग दुसऱ्या डावात शून्यावर बाद झाला, तर लोकेश राहुल दहा धावांवर परतला. उपाहारावेळी भारताच्या २ बाद १७ धावा झाल्या होत्या. उपाहारानंतरही चेतेश्वर पुजारा, कर्णधार अजिंक्य रहाणे हे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले, तर ब्रॉडने तिसाव्या षटकात लागोपाठच्या चेंडूंवर विराट कोहली आणि दिनेश कार्तिकला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हार्दिक पंड्या आणि रविचंद्रन अश्विन यांनी सातव्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी रचून भारताचे शतक धावफलकावर लावले. अखेर वोक्सला ही जोडी फोडण्यात यश आले. पंड्याने २६ धावा केल्या. त्यानंतर कुलदीप यादवही बाद झाला. अश्विनने ४८ चेंडूत सर्वाधिक नाबाद ३३ धावा केल्या.
भारत x इंग्लंड दुसरी कसोटी; स्कोअरकार्ड पाहण्यासाठी टॅप करा
लॉर्ड्स स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला नामुष्कीकारक पराभावाचा सामना करावा लागला. इंग्लंडने पहिल्या डावात २८९ धावांची बलाढ्य आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावातही टीम इंडियाची पडझड झाली. त्यामुळे इंग्लंडने टीम इंडियाला एक डाव १५९ धावांनी पराभूत केले. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडने टीम इंडियावर २-० ने आघाडी घेतली आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. अत्यंत डळमळीत सुरुवात झालेल्या टीम इंडियाची ३५.२ षटकामध्येच संपूर्ण वाताहात झाली. टीम इंडियाचा पहिला डाव केवळ १०७ धावांत आटोपला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या इंग्लंडने ७ गडी गमावत ३९६ धावांचा डोंगर रचून पहिला डाव घोषित केला. पहिला डाव घोषित करताना इंग्लंडने टीम इंडियावर २८९ धावांची आघाडी घेतली होती. इंग्लंडचा ख्रिस वोक्स १७७ चेंडूंमध्ये २१ चौकारांसह १३७ धावांवर नाबाद राहिला. करनने ५ चौकार व एका षटकारासह ४९ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या. भारतातर्फे महंमद शमी व हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. मात्र या २८९ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर अक्षरश: नांगी टाकली. टीम इंडियाचा संपूर्ण संघ १३० धावांवर बाद झाला.
२८९ धावांचा पाठलाग करताना अँडरसनच्या गोलंदाजीवर मुरली विजय सलग दुसऱ्या डावात शून्यावर बाद झाला, तर लोकेश राहुल दहा धावांवर परतला. उपाहारावेळी भारताच्या २ बाद १७ धावा झाल्या होत्या. उपाहारानंतरही चेतेश्वर पुजारा, कर्णधार अजिंक्य रहाणे हे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले, तर ब्रॉडने तिसाव्या षटकात लागोपाठच्या चेंडूंवर विराट कोहली आणि दिनेश कार्तिकला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हार्दिक पंड्या आणि रविचंद्रन अश्विन यांनी सातव्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी रचून भारताचे शतक धावफलकावर लावले. अखेर वोक्सला ही जोडी फोडण्यात यश आले. पंड्याने २६ धावा केल्या. त्यानंतर कुलदीप यादवही बाद झाला. अश्विनने ४८ चेंडूत सर्वाधिक नाबाद ३३ धावा केल्या.
भारत x इंग्लंड दुसरी कसोटी; स्कोअरकार्ड पाहण्यासाठी टॅप करा