अ‍ॅपशहर

'विराट' यशासाठी इंग्लंडचे भारताला ३२२ धावांचे आव्हान

इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील निर्भेळ यशासाठी भारताला ३२२ धावांचे आव्हान पार करावे लागणार आहे. कोलकाता वन-डे सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात आठ बाद ३२१ धावा केल्या आहेत. भारताच्या हार्दिक पांड्याने ३, जाडेजाने २ तर जसप्रित बुमराहने एका फलंदाजाला बाद केले.

Maharashtra Times 22 Jan 2017, 5:40 pm
मटा ऑनलाइन वृत्त । कोलकाता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम england set target for india 322 in kolkata odi criket match
'विराट' यशासाठी इंग्लंडचे भारताला ३२२ धावांचे आव्हान


इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील निर्भेळ यशासाठी भारताला ३२२ धावांचे आव्हान पार करावे लागणार आहे. कोलकाता वन-डे सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात आठ बाद ३२१ धावा केल्या आहेत. भारताच्या हार्दिक पांड्याने ३, जाडेजाने २ तर जसप्रित बुमराहने एका फलंदाजाला बाद केले.

भारताने नाणेफेक जिंकल्यांनंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचे सलामीचे फलंदाज जेसन रॉय आणि सॅम बिलिंग्स यांनी ९८ धावांची भागीदारी रचली. सलामीची जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरत असताना रवींद्र जाडेजाने जेनिंग्ज आणि त्यापाठोपाठ जेसन रॉय बाद केले. त्यानंतर कर्णधार इयॉन मॉर्गन आणि जॉनी बेअरस्टोने तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी रचली.
अखेरच्या काही षटकांमध्ये वोक्सने १९ चेंडूत ३४ धावा केल्या. तर बेन स्टोक्सनेही फटकेबाजी करत ३९ चेंडूत ५७ धावांची खेळी केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज