वृत्तसंस्था, मेलबर्न
पुढील वर्षाच्या प्रारंभी भारताशी तीन सामन्यांची वनडे मालिका खेळण्याची तयारी अखेर ऑस्ट्रेलियाने दर्शविली आहे. महिलांच्या आता सुरू असलेल्या टी-२० लीगसाठी आपल्या महिला क्रिकेटपटूंना न पाठविण्याचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाने भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. पण हा प्रयत्न आता ऑस्ट्रेलियाने सोडून दिला असून वनडे मालिका खेळण्याची तयारी केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा हंगाम ऐन भरात असताना त्यांना भारताशी वनडे मालिका खेळायची नव्हती. म्हणून त्यांनी एलिझ पेरी, मेग लॅनिंग, अॅलिसा हिली या महिला खेळाडूंना सध्या सुरू असलेल्या महिलांच्या टी-२० लीगसाठी पाठविण्याची तयारी दाखविली नाही. भारतावर एकप्रकारे हा दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचे बीसीसीआयने म्हटले होते.
मात्र आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, भारताशी तीन वनडे सामन्यांची मालिका खेळण्यास आम्ही बांधील आहोत. या मालिकेमुळे आमच्या कार्यक्रमात बदल केला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या २०१९-२०२०च्या वेळापत्रकात या मालिकेचा समावेश केल्याचे त्यांच्या वेबसाईटवर स्पष्ट होते आहे.
भविष्यातील कार्यक्रमानुसार ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील वर्षी जानेवारीत १० दिवसांच्या भारत दौऱ्यावर येईल असे ठरले होते. पण ऐन स्थानिक हंगामात हा दौरा असल्यामुळे टीव्ही प्रसारण करणाऱ्यांकडून क्रिकेट ऑस्ट्रेलियावर ही मालिका न खेळण्यासाठी दबाव येऊ लागला. पण आता न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चॅपेल-हॅडली ट्रॉफी कसोटी मालिका डिसेंबरमध्ये खेळली जाईल आणि या दोन संघांतील वनडे मालिका मार्चमध्ये होईल. त्यादरम्यान जानेवारीत ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर जाईल.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हिन रॉबर्ट्स आणि बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली. त्यात जोहरी यांच्याकडून रॉबर्टस यांना सांगण्यात आले की, जो कार्यक्रम निश्चित झाला आहे, त्यातून माघार घेणे योग्य नाही.
पुढील वर्षाच्या प्रारंभी भारताशी तीन सामन्यांची वनडे मालिका खेळण्याची तयारी अखेर ऑस्ट्रेलियाने दर्शविली आहे. महिलांच्या आता सुरू असलेल्या टी-२० लीगसाठी आपल्या महिला क्रिकेटपटूंना न पाठविण्याचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाने भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. पण हा प्रयत्न आता ऑस्ट्रेलियाने सोडून दिला असून वनडे मालिका खेळण्याची तयारी केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा हंगाम ऐन भरात असताना त्यांना भारताशी वनडे मालिका खेळायची नव्हती. म्हणून त्यांनी एलिझ पेरी, मेग लॅनिंग, अॅलिसा हिली या महिला खेळाडूंना सध्या सुरू असलेल्या महिलांच्या टी-२० लीगसाठी पाठविण्याची तयारी दाखविली नाही. भारतावर एकप्रकारे हा दबाव आणण्याचा प्रयत्न असल्याचे बीसीसीआयने म्हटले होते.
मात्र आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, भारताशी तीन वनडे सामन्यांची मालिका खेळण्यास आम्ही बांधील आहोत. या मालिकेमुळे आमच्या कार्यक्रमात बदल केला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या २०१९-२०२०च्या वेळापत्रकात या मालिकेचा समावेश केल्याचे त्यांच्या वेबसाईटवर स्पष्ट होते आहे.
भविष्यातील कार्यक्रमानुसार ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील वर्षी जानेवारीत १० दिवसांच्या भारत दौऱ्यावर येईल असे ठरले होते. पण ऐन स्थानिक हंगामात हा दौरा असल्यामुळे टीव्ही प्रसारण करणाऱ्यांकडून क्रिकेट ऑस्ट्रेलियावर ही मालिका न खेळण्यासाठी दबाव येऊ लागला. पण आता न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चॅपेल-हॅडली ट्रॉफी कसोटी मालिका डिसेंबरमध्ये खेळली जाईल आणि या दोन संघांतील वनडे मालिका मार्चमध्ये होईल. त्यादरम्यान जानेवारीत ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर जाईल.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हिन रॉबर्ट्स आणि बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली. त्यात जोहरी यांच्याकडून रॉबर्टस यांना सांगण्यात आले की, जो कार्यक्रम निश्चित झाला आहे, त्यातून माघार घेणे योग्य नाही.