नवी दिल्लीः आगामी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना जरी पाकिस्तानविरुद्ध असला, तरी तो भारताने खेळू नये, असं मत भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने व्यक्त केले आहे. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी राजकारण असो वा खेळ, कोणत्याही पद्धतीचा संबंध ठेवू नये, अशी मागणी जोर धरू लागली होती. अद्यापही सदर मागणीची धार कमी होताना दिसत नाहीये. आगामी विश्वचषकात भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळावे की, नाही, याबाबत भारतीय नियामक मंडळ (बीसीसीआय) निर्णय घेईलच. मात्र, माझे वैयक्तिक मत विचाराल, तर विश्वचषकाचा अंतिम सामना जरी पाकिस्तानविरुद्ध असला, तरी भारताने खेळता कामा नये, असे गंभीरने पुन्हा एकदा स्पष्ट केले.
खेळातील दोन अंकांपेक्षा देशाचे सैनिक जास्त महत्त्वाचे आहेत. विश्वचषकाचा अंतिम सामना असला, तरी तो न खेळण्याबाबत देशातील जनता नक्की पाठिंबा देईल. एकदा आपण निर्णय घेतला, तर त्यापासून मागे फिरता कामा नये. खेळ आणि राजकारण याची तुलना करणे योग्य नाही, असंही गंभीर यानं नमूद केलं.
खेळातील दोन अंकांपेक्षा देशाचे सैनिक जास्त महत्त्वाचे आहेत. विश्वचषकाचा अंतिम सामना असला, तरी तो न खेळण्याबाबत देशातील जनता नक्की पाठिंबा देईल. एकदा आपण निर्णय घेतला, तर त्यापासून मागे फिरता कामा नये. खेळ आणि राजकारण याची तुलना करणे योग्य नाही, असंही गंभीर यानं नमूद केलं.