बर्मिंगहॅम : 'भुवनेश्वरची अनुपस्थिती भारतासाठी मोठा धक्का आहे. दुखापतीमुळे भुवीला वन-डेत चमक दाखविता आली नाही. पण, भारतीय संघ एकाच गोलंदाजावर अवलंबून नाही. सुरुवातीला ते केवळ कुंबळे, श्रीनाथ आणि नंतर झहीर खान यांच्यावर अवलंबून असायचे. आता भारतीय संघात तशी परिस्थिती राहिलेली नाही. कुठल्याही प्रकारच्या खेळपट्टीवर खेळण्यासाठी त्यांचे गोलंदाज सज्ज आहेत,' असे मत इंग्लंडचे माजी वेगवान गोलंदाज डॅरेन गॉघ यांनी व्यक्त केले. भुवीकडे स्विंग आहे, बुमराह चेंडू स्किड करण्यात तरबेज आहे, तर यादव नव्या चेंडूला चांगले वळण देऊ शकतो. शमीकडे चांगला वेग असून, इशांत शर्माकडे अनुभव आणि आक्रमकता असल्याचे त्यांनी सांगितले.
गॉघ म्हणतात, भारताची गोलंदाजी संतुलित
'भुवनेश्वरची अनुपस्थिती भारतासाठी मोठा धक्का आहे. दुखापतीमुळे भुवीला वन-डेत चमक दाखविता आली नाही. पण, भारतीय संघ एकाच गोलंदाजावर अवलंबून नाही. सुरुवातीला ते केवळ कुंबळे, श्रीनाथ आणि नंतर झहीर खान यांच्यावर अवलंबून असायचे.
Maharashtra Times 30 Jul 2018, 5:05 am