अ‍ॅपशहर

'त्या' रन-आऊटनंतर पंड्याने काय केलं माहित्येय?

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. त्या सामन्यात शानदार खेळी करणारा हार्दिक पंड्या धावचीत झाला आणि भारतीय प्रेक्षकांना धक्का बसला. चांगला खेळत असतानाच बाद झाल्यामुळे पंड्या संतप्त अवस्थेत पॅव्हेलियनमध्ये परतला. अखेर २० दिवसांनी त्याने या विषयावर मौन सोडले.

Maharashtra Times 6 Jul 2017, 3:52 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम hardik pandya revels how much time it took to come out from run out
'त्या' रन-आऊटनंतर पंड्याने काय केलं माहित्येय?


चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. त्या सामन्यात शानदार खेळी करणारा हार्दिक पंड्या धावचीत झाला आणि भारतीय प्रेक्षकांना धक्का बसला. चांगला खेळत असतानाच बाद झाल्यामुळे पंड्या संतप्त अवस्थेत पॅव्हेलियनमध्ये परतला. अखेर २० दिवसांनी त्याने या विषयावर मौन सोडले.

'पाकिस्तानविरुद्धच्या महत्वपूर्ण सामन्यात धावचीत झाल्यामुळे मला खूपच राग आला होता. पण त्यानंतर थोड्याच वेळात माझा राग गेला. खरं सांगू तर अवघ्या तीन मिनिटांत मी राग विसरलो. ते अगदी क्षणिक होतं. धावचीत झाल्याने मला लगेच राग आला पण ड्रेसिंग रूममध्ये आल्यावर माझा राग निवळला. थोड्या वेळाने तर मी चक्क हसत होतो आणि मला पाहून इतर खेळाडूही हसायला लागले' असे पंड्याने नमूद केले.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात एकट्या पंड्याने ७६ धावांची शानदार खेळी केली. मात्र तो बाद झाल्यानंतर भारताची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली आणि भारताचा १८० धावांनी पराभव झाला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज