दिल्ली: कॉफी विथ करण या कार्यक्रमात महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे खेळाडू हार्दिक पंड्या आणि के. एल राहूल या दोघांचे निलंबन मागे घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. हार्दिक पंड्या न्यूझीलंडविरुद्ध होत असलेल्या एकदिवसीय मालिकेत खेळणार असून के. एल. राहुल सध्या तरी भारत ए टीमकडून खेळणार आहे.
काही दिवसांपूर्वी करण जोहर याने कॉफी विथ करण या कार्यक्रमात हार्दिक पंड्या आणि के. एल. राहुल या दोघांचीही मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत महिलांबद्दल अनेक आक्षेपार्ह विधानं केल्यामुळे हार्दिक पंड्या आणि के. एल.राहुल दोघांनाही तडकाफडकी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून भारतात परत बोलवण्यात आलं होतं. बीसीसीआयने त्या दोघांनाही तात्काळ निलंबित करून चौकशी समिती गठित केली. आता या समितीसाठी लोकपाल अधिकारी देण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची आहे.
पण या समितीने केलेल्या चौकशीचा निकाल यायला भरपूर वेळ लागेल आणि या दोन्ही तरूण खेळाडूंच्या करिअरचे प्रचंड नुकसान होईल. यामुळेच चौकशी समितीचा निर्णय येईपर्यंत निलंबन मागे घेण्यात यावे अशी मागणी माजी कर्णधार सौरव गांगुलीने केली होती. बीसीसीआयचे अधिकारी सी.के. खन्ना यांनी हा प्रस्ताव बीसीसीआय समोर मांडला होता. करण जोहरनेही हीच मागणी केली होती. बीसीसीआयने यासंबंधीत निर्णय न्यायमित्र पी.सी.नरसिम्हा यांच्यावर सोपवला होता. नरसिम्हा यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर दोघांचेही निलंबन मागे घेण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी करण जोहर याने कॉफी विथ करण या कार्यक्रमात हार्दिक पंड्या आणि के. एल. राहुल या दोघांचीही मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत महिलांबद्दल अनेक आक्षेपार्ह विधानं केल्यामुळे हार्दिक पंड्या आणि के. एल.राहुल दोघांनाही तडकाफडकी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून भारतात परत बोलवण्यात आलं होतं. बीसीसीआयने त्या दोघांनाही तात्काळ निलंबित करून चौकशी समिती गठित केली. आता या समितीसाठी लोकपाल अधिकारी देण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची आहे.
पण या समितीने केलेल्या चौकशीचा निकाल यायला भरपूर वेळ लागेल आणि या दोन्ही तरूण खेळाडूंच्या करिअरचे प्रचंड नुकसान होईल. यामुळेच चौकशी समितीचा निर्णय येईपर्यंत निलंबन मागे घेण्यात यावे अशी मागणी माजी कर्णधार सौरव गांगुलीने केली होती. बीसीसीआयचे अधिकारी सी.के. खन्ना यांनी हा प्रस्ताव बीसीसीआय समोर मांडला होता. करण जोहरनेही हीच मागणी केली होती. बीसीसीआयने यासंबंधीत निर्णय न्यायमित्र पी.सी.नरसिम्हा यांच्यावर सोपवला होता. नरसिम्हा यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर दोघांचेही निलंबन मागे घेण्यात आले आहे.