रांची:
भारताला दुसऱ्यांदा क्रिकेटचा विश्वचषक मिळवून देणारा क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीने कर्णधारपद का सोडलं असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. अनेक दिवस धोनीनेही याबाबत मौन बाळगलं होतं. पण विराट कोहलीला २०१९ विश्वचषकासाठी तयार करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचा खुलासा नुकताच त्याने रांचीत एका कार्यक्रमात केला.
रांची विमानतळावर तरुणांसाठी एका प्रेरणादायी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात धोनीला कर्णधारपद का सोडलं असा एका चाहत्याने प्रश्न विचारला. तेव्हा ३७वर्षीय धोनी म्हणाला,'२०१९ रोजी होणाऱ्या विश्वचषकासाठी मला विराटला तयार करायचं होतं. एक उत्तम संघ आणि त्याचं नेतृत्व करणारा योग्य कर्णधार एका रात्रीत तयार होत नसतो. त्यासाठी कर्णधाराची योग्य जडणघडण व्हावी लागते. विराट त्यासाठी तयार व्हावा माझी इच्छा होती'. तसंच आपण कर्णधारपद सोडण्याचा निर्णय योग्य वयात,योग्य वेळी घेतल्याचंही धोनीने सांगितलं.
२०११मध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने विश्वचषक मिळवला होता. त्यानंतर तीनच वर्षांत २०१४मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेतला होता.
भारताला दुसऱ्यांदा क्रिकेटचा विश्वचषक मिळवून देणारा क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीने कर्णधारपद का सोडलं असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. अनेक दिवस धोनीनेही याबाबत मौन बाळगलं होतं. पण विराट कोहलीला २०१९ विश्वचषकासाठी तयार करण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचा खुलासा नुकताच त्याने रांचीत एका कार्यक्रमात केला.
२०११मध्ये महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने विश्वचषक मिळवला होता. त्यानंतर तीनच वर्षांत २०१४मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेतला होता.