अ‍ॅपशहर

कठीण परिस्थितीत विराट शोधतो मार्ग

कठीण परिस्थितीत तुम्ही सकारात्मक विचार केलात तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतात, अशा विचारांची मांडणी भारतीय क्रिकेटचा कर्णधार विराट कोहली करतो. त्याचे याबाबतचे अगदी सोपे समीकरण आहे. पाकिस्तानविरुद्धच्या बहुचर्चित चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम फेरीपूर्वी पत्रकार परिषदेत आपल्या मनातील भावभावनांना तो वाट मोकळी करून देतो.

Maharashtra Times 18 Jun 2017, 12:03 am
लंडन : कठीण परिस्थितीत तुम्ही सकारात्मक विचार केलात तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागतात, अशा विचारांची मांडणी भारतीय क्रिकेटचा कर्णधार विराट कोहली करतो. त्याचे याबाबतचे अगदी सोपे समीकरण आहे. पाकिस्तानविरुद्धच्या बहुचर्चित चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम फेरीपूर्वी पत्रकार परिषदेत आपल्या मनातील भावभावनांना तो वाट मोकळी करून देतो. विराटचे म्हणणे आहे की, जर भारतीय संघाचे तीन फलंदाज बाद झालेत आणि मी असा विचार केला की, मी बाद होईन तर मी बादच होणार. पण तीन फलंदाज माघारी परतेल आहेत आणि आता मला प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडायचे आहे असा जर मी विचार केला तर मी संघाला रुळावर नक्की घेऊन येऊ शकेन. कारण शेवटी तुम्हाला स्वतःवर विश्वास असतो. एखाद्या आव्हानात्मक सामन्यासाठी सज्ज होताना विराट मनाचीही अशी पक्की बांधणी करतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम i visualise tough situations and then find solutions kohli
कठीण परिस्थितीत विराट शोधतो मार्ग


विराट आव्हानात्मक परिस्थितीची कल्पना करून त्यातून आपल्या संघाला बाहेर काढण्याचा विचार पक्का करतो. हे प्रत्येकवेळी शक्य होत नाही, पण त्याचा विश्वास आहे की १०पैकी ८ वेळा असा सकारात्मक विचार केला की सगळे शक्य आहे.

विराट सांगतो की, मी कुणाचेही व्हीडिओ फार काळ पाहात नाही. मला जशी तयारी करायची असते तशी करतो. माझ्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. जर माझे तंत्र उत्तम आहे तर मी कोणत्याही गोलंदाजाचा सामना करू शकतो. तेव्हा मी विचार करत नाही की, अमूक गोलंदाज अमूक ठिकाणाहून गोलंदाजी करणार आहे. जर त्याने तिथून गोलंदाजी केली नाही तर काय ? तुम्ही कशाचीही खात्री देऊ शकत नाही. एखाद्या गोलंदाजाला तुम्ही आधीच्या दोन सामन्यात चांगले कुटून काढले असेल तरी कदाचित तिसऱ्या सामन्यात तो तुम्हाला बाद करू शकतो. शेवटी तुम्ही समोर आलेल्या चेंडूचा कसा सामना करता हे महत्त्वाचे.

पंड्यावर विश्वास

उमेश यादवला हार्दिक पंड्याऐवजी संधी देणार का, या प्रश्नावर तो म्हणतो की, फार बदल करण्याची माझी इच्छा नाही. त्यात पंड्यामुळे संघ संतुलित होतो. तो गोलंदाज म्हणूनही उपयुक्त आहे पण जेव्हा संघाला षटकामागे ८ धावांची गरज असते तेव्हा तो फलंदाजीही करू शकतो. तो सामना जिंकून देणारी खेळी खेळू शकतो.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज