अ‍ॅपशहर

'विराटपेक्षा सचिनच सरस, क्रिकेटचा दर्जा घसरलाय!'

विराट कोहली हा मला लहान भावासारखा आहे. तो 'जबरा' क्रिकेटवीर आहे, चॅम्पियन आहे. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याच्याहून सरस आहे आणि कायम नंबर वन राहील, असं मत भारताचा 'टर्बनेटर' म्हणून ओळखला जाणारा फिरकीपटू हरभजनसिंगनं व्यक्त केलं आहे.

Maharashtra Times 22 Feb 2017, 1:18 pm
मटा ऑनलाइन वृत्त । पुणे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम i will place sachin tendulkar higher than virat kohli harbhajan singh
'विराटपेक्षा सचिनच सरस, क्रिकेटचा दर्जा घसरलाय!'


विराट कोहली हा मला लहान भावासारखा आहे. तो 'जबरा' क्रिकेटवीर आहे, चॅम्पियन आहे. पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर त्याच्याहून सरस आहे आणि कायम नंबर वन राहील, असं मत भारताचा 'टर्बनेटर' म्हणून ओळखला जाणारा फिरकीपटू हरभजनसिंगनं व्यक्त केलं आहे.

टी-२० मुळे क्रिकेटचा दर्जा घसरला आहे. परंतु, त्याच्या आहारी न जाता क्रिकेटपटूंनी खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं असल्याची सूचनाही त्यानं केली.
विराट कोहलीच्या प्रत्येक मोठ्या खेळीनंतर त्याची तुलना सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा किंवा अन्य एखाद्या महान क्रिकेटपटूसोबत केली जाते. सचिनचे विक्रम कोहली सहज मोडेल, असंही खात्रीनं बोललं जातं. परंतु, या दोघांमध्ये भज्जीनं त्याच्या लाडक्या सचिन पाजीला झुकतं माप दिलं आहे.

सचिन आणि विराट हे दोघं वेगवेगळ्या काळातील क्रिकेटपटू आहेत. त्यांच्यासमोरचे गोलंदाज वेगळे आहेत. त्यामुळे त्यांची तुलना करणं योग्य नाही. पण जर डावं-उजवं करायचंच असेल तर मी सचिनला विराटच्या वरचं स्थान देईन. त्यानं ज्या गोलंदाजांचा सामना केला, ती क्षमता आजच्या गोलंदाजांमध्ये नाही, असं हरभजननं ठामपणे सांगितलं.

गेल्या काही वर्षांत गोलंदाजीचा दर्जा खालावला आहे. टी-२० मुळे एकूणच क्रिकेटमधील परिमाणं बदलली आहेत. टी-२० सामन्यात दहा ओव्हरमध्ये ४-५ विकेट घेतल्या जातात आणि तशीच अपेक्षा वनडेतही केली जाते. पण परदेशातील खेळपट्ट्यांवर दोन विकेटसाठी अनेकदा ३०-३५ ओव्हरपर्यंतही वाट पाहावी लागते. त्यामुळे आपण कुठे खेळतोय, हे पाहून खेळाचा विचार करायला हवा, याकडे त्यानं लक्ष वेधलं.

आयपीएलमध्ये सीमारेषा जवळ आणण्याच्या प्रकारावरही भज्जीनं नाराजी व्यक्त केली. चीअरगर्ल्ससाठी वेगळी जागा द्या, सीमारेषा जवळ आणणं योग्य नाही. तसं केल्यानं एखादा चुकलेला फटकाही सहज सीमेपार जातो आणि हे फिरकी गोलंदाजीसाठी मारक आहे, असं तो म्हणाला.

सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली खेळतानाचा काळ सर्वोत्तम होता, असंही त्यानं आवर्जून सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज