नवी दिल्ली : वर्ल्डकपच्या महाकुंभात महत्त्वपूर्ण असे दोन गुण पाकिस्तानसारख्या कट्टर प्रतिस्पर्धी संघाला आंदण का द्यायचे, असा सवाल करत भारतरत्न सचिन तेंडुलकरने माजी कर्णधार सुनील गावस्कर यांच्या सुरात सूर मिसळला आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानसोबत खेळू नये, अशी मागणी जोर धरत आहे. क्रिकेटपटू हरभजन सिंग, युजवेंद्र चहल याच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी पाकिस्तानवर संपूर्ण बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर या दोन महान क्रिकेटपटूंनी वर्ल्डकपमध्ये पाकची कोंडी करायची असेल तर पाकसोबतचा सामना खेळायला हवा व त्यांना हरवायला हवे, असे मत व्यक्त केले आहे.
भारताने वर्ल्डकपमध्ये नेहमीच चांगला खेळ केल्याचा इतिहास असून आगामी वर्ल्डकपमध्ये याची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे. मला विचाराल तर एखाद्या संघाला दोन गुण असेच आंदण देणे मला मान्य नाही. असे केल्यास त्या संघाला स्पर्धेत पुढे जाण्याची आयती संधी आपण देणार आहोत, असे मत सचिनने नोंदवले.
पाकिस्तानला फायदा होऊ नये म्हणून मी पाकसोबत वर्ल्डकपमध्ये खेळण्याचे समर्थन करत असलो तरी या सर्वात माझा देश माझ्यासाठी सर्वोच्च स्थानी आहे. त्यामुळे देश जो निर्णय घेईल त्यासोबत मी असेन, असेही सचिनने पुढे नमूद केले.
दरम्यान, येत्या ३० मे पासून इंग्लंडमध्ये क्रिकेटचा महाकुंभ सूरू होत असून वर्ल्डकपच्या वेळापत्रकानुसार १६ जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 'हायव्होल्टेज' सामना होणार आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानसोबत खेळू नये, अशी मागणी जोर धरत आहे. क्रिकेटपटू हरभजन सिंग, युजवेंद्र चहल याच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी पाकिस्तानवर संपूर्ण बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर या दोन महान क्रिकेटपटूंनी वर्ल्डकपमध्ये पाकची कोंडी करायची असेल तर पाकसोबतचा सामना खेळायला हवा व त्यांना हरवायला हवे, असे मत व्यक्त केले आहे.
भारताने वर्ल्डकपमध्ये नेहमीच चांगला खेळ केल्याचा इतिहास असून आगामी वर्ल्डकपमध्ये याची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे. मला विचाराल तर एखाद्या संघाला दोन गुण असेच आंदण देणे मला मान्य नाही. असे केल्यास त्या संघाला स्पर्धेत पुढे जाण्याची आयती संधी आपण देणार आहोत, असे मत सचिनने नोंदवले.
पाकिस्तानला फायदा होऊ नये म्हणून मी पाकसोबत वर्ल्डकपमध्ये खेळण्याचे समर्थन करत असलो तरी या सर्वात माझा देश माझ्यासाठी सर्वोच्च स्थानी आहे. त्यामुळे देश जो निर्णय घेईल त्यासोबत मी असेन, असेही सचिनने पुढे नमूद केले.
दरम्यान, येत्या ३० मे पासून इंग्लंडमध्ये क्रिकेटचा महाकुंभ सूरू होत असून वर्ल्डकपच्या वेळापत्रकानुसार १६ जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 'हायव्होल्टेज' सामना होणार आहे.