लंडन:
टीम इंडियाचा आयसीसी वर्ल्डकप २०१९ मधील प्रवास यशस्वीपणे सुरू असून आता पर्यंत झालेल्या दोन सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला आहे. बलाढ्य गणल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगल्या कामगिरीनंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला आहे. असे असले तरी कर्णधार विराट कोहलीने संयम बाळगला असून त्याने खेळावरच लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे. भारत हा वर्ल्डकप जिंकणार किंवा कसे याबाबत आत्ताच काही सांगता यायचे नाही, त्या बद्दल काही बोलणे घाईचे होईल, अशी प्रतिक्रिया विराट कोहलीने एका प्रश्नाला उत्तर देतना व्यक्त केली आहे.
उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग भारतासाठी आता सोपा झाला आहे का, या प्रश्नाचे उत्तर देताना विराटने या बाबच आताच विचार करणे घाईचे होईल असे म्हटले आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे स्थान काय हे पाहण्यासाठी कमीतकमी सहा सामने खेळणे आवश्यक असल्याचे विराट म्हणाला.
'ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय गरजेचा होता'
भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा पराभव करणे अत्यंत गरजेचे होते, असे विराट म्हणाला. भारताला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचाच होता. याचे कारण म्हणजे या पूर्वी झालेल्या मालिकेत भारताचा २-० असा पराभव झाला होता. भारतातील ती मालिका गमावल्यानंतरचा हा विजय महत्त्वाचा होता. आम्हाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्वत:ला सिद्ध करायचे होते. आम्ही या सामन्यात पहिल्या चेंडूपासूनच पक्क्या इराद्यानिशी उतरलो होतो. आमची सलामीची फलंदाजी अप्रतिम होती. मी देखील काही धावा केल्या आणि धोनीही उत्तम खेळला, अशा शब्दात विराटने समाधान व्यक्त केले.
सुरुवातीलाच आम्ही बलाढ्य संघांविरुद्ध जिंकलो हे चांगले झाल्याचे विराट म्हणाला. आम्ही असेच खेळत राहिलो, तर आमचा उपांत्य फेरीत पोहोचण्याबाबतचा आत्मविश्वास आणखी वाढेल, असेही धोनी म्हणाला.
टीम इंडियाचा आयसीसी वर्ल्डकप २०१९ मधील प्रवास यशस्वीपणे सुरू असून आता पर्यंत झालेल्या दोन सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला आहे. बलाढ्य गणल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगल्या कामगिरीनंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला आहे. असे असले तरी कर्णधार विराट कोहलीने संयम बाळगला असून त्याने खेळावरच लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे. भारत हा वर्ल्डकप जिंकणार किंवा कसे याबाबत आत्ताच काही सांगता यायचे नाही, त्या बद्दल काही बोलणे घाईचे होईल, अशी प्रतिक्रिया विराट कोहलीने एका प्रश्नाला उत्तर देतना व्यक्त केली आहे.
उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग भारतासाठी आता सोपा झाला आहे का, या प्रश्नाचे उत्तर देताना विराटने या बाबच आताच विचार करणे घाईचे होईल असे म्हटले आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचे स्थान काय हे पाहण्यासाठी कमीतकमी सहा सामने खेळणे आवश्यक असल्याचे विराट म्हणाला.
'ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय गरजेचा होता'
भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा पराभव करणे अत्यंत गरजेचे होते, असे विराट म्हणाला. भारताला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचाच होता. याचे कारण म्हणजे या पूर्वी झालेल्या मालिकेत भारताचा २-० असा पराभव झाला होता. भारतातील ती मालिका गमावल्यानंतरचा हा विजय महत्त्वाचा होता. आम्हाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्वत:ला सिद्ध करायचे होते. आम्ही या सामन्यात पहिल्या चेंडूपासूनच पक्क्या इराद्यानिशी उतरलो होतो. आमची सलामीची फलंदाजी अप्रतिम होती. मी देखील काही धावा केल्या आणि धोनीही उत्तम खेळला, अशा शब्दात विराटने समाधान व्यक्त केले.
सुरुवातीलाच आम्ही बलाढ्य संघांविरुद्ध जिंकलो हे चांगले झाल्याचे विराट म्हणाला. आम्ही असेच खेळत राहिलो, तर आमचा उपांत्य फेरीत पोहोचण्याबाबतचा आत्मविश्वास आणखी वाढेल, असेही धोनी म्हणाला.