जॅक कॅलिस
बांगलादेशविरुद्ध दक्षिण आफ्रिकेला पत्करावा लागलेला पराभव खरोखरच गांभीर्याने घ्यायला हवा. फाफ डुप्लेसिसच्या टीमची आता पुढील वाटचाल खडतर झालेली आहे. बांगलादेशला प्रथम फलंदाजी करण्याची संधी देत दक्षिण आफ्रिकेने चूक केली. बांगलादेशने अगदी सुरुवातीपासून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले. बांगलादेशच्या मश्रफी मोर्तझाने लढतीआधी एक विधान केले होते की, 'आम्ही कडवी झुंज देणार. आगीशीच मुकाबला करायचा आहे, असे गृहित धरून चाललो आहोत. त्यासाठी आम्हालाही आग व्हावे लागेल'. बांगलादेशने आपला शब्द तंतोतंत पाळला.
माझ्या चिंतेत भर टाकली ती दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीने. या गोलंदाजांकडे पर्यायी डावपेचच तयार नव्हते. आपले आधीचे डावपेच फळले नाहीत, तर पर्यायी योजना तयार हव्यात. इथे मी आणखी एक गोष्ट आवर्जून नमूद करेन की बांगलादेशचे फलंदाज आखूड टप्प्याचे चेंडूदेखील खूप सहज खेळत होते. अशावेळी तेज गोलंदाज वेगळा पर्याय निवडत बुंद्यात मारा करतील, अशी अपेक्षा होती; पण ते घडले नाही. या चुकांबाबत दक्षिण आफ्रिकेने चर्चा केली असावी, अशी मी अपेक्षा करतो. ते आवश्यक आहे; कारण दक्षिण आफ्रिकेचा बुधवारी सामना होतो आहे तो भारताशी. फाफ डुप्लेसिसच्या संघाने भारताविरुद्धची लढतही गमावली तर उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी त्यांना उर्वरित सगळ्या सहा लढती जिंकाव्या लागतील. एवढेच नव्हे अन् जर वर्ल्डकप जिंकायचा असेल, तर सलग आठ लढती जिंकाव्या लागतील.
विराटच्या भारतीय संघाची तयारी परिपूर्ण आहे. आयपीएलमुळे सगळ्या खेळाडूंना स्पर्धात्मक सामन्यांचा सराव मिळाला आहेच. वर्ल्डकप उपांत्य फेरीतील चार संघ कोण असतील याचा अंदाज बांधताना मी नेहमीच भारताचा विचार करतो. त्यांच्याखेरीज इंग्लंड, ऑस्ट्रेलिया मला उपांत्य फेरीसाठी फेव्हरिट वाटतात. मात्र माझ्या मते सर्वाधिक संधी असेल ती दक्षिण आफ्रिकेला. मला आशा आहे की जायबंदी डेल स्टेन वेळेत फिट व्हावा आणि भारताविरुद्ध खेळावा. डेलला खेळवणे जोखमीचे ठरेल; पण फाफ पुढे त्याशिवाय पर्यायच नसेल.
(गेमप्लान/चिवाच स्पोर्ट)
बांगलादेशविरुद्ध दक्षिण आफ्रिकेला पत्करावा लागलेला पराभव खरोखरच गांभीर्याने घ्यायला हवा. फाफ डुप्लेसिसच्या टीमची आता पुढील वाटचाल खडतर झालेली आहे. बांगलादेशला प्रथम फलंदाजी करण्याची संधी देत दक्षिण आफ्रिकेने चूक केली. बांगलादेशने अगदी सुरुवातीपासून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले. बांगलादेशच्या मश्रफी मोर्तझाने लढतीआधी एक विधान केले होते की, 'आम्ही कडवी झुंज देणार. आगीशीच मुकाबला करायचा आहे, असे गृहित धरून चाललो आहोत. त्यासाठी आम्हालाही आग व्हावे लागेल'. बांगलादेशने आपला शब्द तंतोतंत पाळला.
माझ्या चिंतेत भर टाकली ती दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीने. या गोलंदाजांकडे पर्यायी डावपेचच तयार नव्हते. आपले आधीचे डावपेच फळले नाहीत, तर पर्यायी योजना तयार हव्यात. इथे मी आणखी एक गोष्ट आवर्जून नमूद करेन की बांगलादेशचे फलंदाज आखूड टप्प्याचे चेंडूदेखील खूप सहज खेळत होते. अशावेळी तेज गोलंदाज वेगळा पर्याय निवडत बुंद्यात मारा करतील, अशी अपेक्षा होती; पण ते घडले नाही. या चुकांबाबत दक्षिण आफ्रिकेने चर्चा केली असावी, अशी मी अपेक्षा करतो. ते आवश्यक आहे; कारण दक्षिण आफ्रिकेचा बुधवारी सामना होतो आहे तो भारताशी. फाफ डुप्लेसिसच्या संघाने भारताविरुद्धची लढतही गमावली तर उपांत्य फेरीत धडक मारण्यासाठी त्यांना उर्वरित सगळ्या सहा लढती जिंकाव्या लागतील. एवढेच नव्हे अन् जर वर्ल्डकप जिंकायचा असेल, तर सलग आठ लढती जिंकाव्या लागतील.
विराटच्या भारतीय संघाची तयारी परिपूर्ण आहे. आयपीएलमुळे सगळ्या खेळाडूंना स्पर्धात्मक सामन्यांचा सराव मिळाला आहेच. वर्ल्डकप उपांत्य फेरीतील चार संघ कोण असतील याचा अंदाज बांधताना मी नेहमीच भारताचा विचार करतो. त्यांच्याखेरीज इंग्लंड, ऑस्ट्रेलिया मला उपांत्य फेरीसाठी फेव्हरिट वाटतात. मात्र माझ्या मते सर्वाधिक संधी असेल ती दक्षिण आफ्रिकेला. मला आशा आहे की जायबंदी डेल स्टेन वेळेत फिट व्हावा आणि भारताविरुद्ध खेळावा. डेलला खेळवणे जोखमीचे ठरेल; पण फाफ पुढे त्याशिवाय पर्यायच नसेल.
(गेमप्लान/चिवाच स्पोर्ट)