विशाखापट्टणम:
'वेस्ट इंडिजच्या टीमचे खेळाडू काल उत्तम क्रिकेट खेळले. त्यामुळे हा सामना बरोबरीत संपला' असं म्हणत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आपल्या प्रतिस्पर्धी संघाचं कौतुक केलंय.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील यांच्यात सुरू असलेल्या वनडे मालिकेतील दुसरा सामना बुधवारी विशाखापट्टणम येथे रंगला. सामना 'टाय' झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना विराट कोहली म्हणाला, 'सर्वप्रथम मी सांगू इच्छितो आजचा सामना अतिशय उत्तम सामन्यांपैकी एक होता. याचे श्रेय वेस्ट इंडिच्या टीमला जाते. वेस्ट इंडिजच्या टीमचे सगळेच खेळाडू काल उत्तम क्रिकेट खेळले. हेटमेर आणि होपमुळे विंडिजचा पराभव टळला. '
डॉ. वाई. एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीसीए स्टेडियममधील अंतिम क्षणापर्यंत रंगलेल्या या रोमहर्षक लढतीत विंडीजला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ५ धावांची आवश्यकता होती. या चेंडूवर शाई होपने चौकार लगावत विंडीजचा पराभव टाळला. भारताने दिलेल्या ३२२ धावांचे आव्हान विंडीज पूर्ण करू शकले नाही, पण ३२१ धावा करत हा सामना बरोबरीत सोडवण्यात विंडीजला यश आले.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने आज वनडेत दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला. २०५ डावांमध्ये ही कामगिरी करत विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. धावांचे हे नवे शिखर गाठताना विराटने नाबाद १५७ धावांची खेळी केली.
'वेस्ट इंडिजच्या टीमचे खेळाडू काल उत्तम क्रिकेट खेळले. त्यामुळे हा सामना बरोबरीत संपला' असं म्हणत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आपल्या प्रतिस्पर्धी संघाचं कौतुक केलंय.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील यांच्यात सुरू असलेल्या वनडे मालिकेतील दुसरा सामना बुधवारी विशाखापट्टणम येथे रंगला. सामना 'टाय' झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना विराट कोहली म्हणाला, 'सर्वप्रथम मी सांगू इच्छितो आजचा सामना अतिशय उत्तम सामन्यांपैकी एक होता. याचे श्रेय वेस्ट इंडिच्या टीमला जाते. वेस्ट इंडिजच्या टीमचे सगळेच खेळाडू काल उत्तम क्रिकेट खेळले. हेटमेर आणि होपमुळे विंडिजचा पराभव टळला. '
डॉ. वाई. एस. राजशेखर रेड्डी एसीए-वीसीए स्टेडियममधील अंतिम क्षणापर्यंत रंगलेल्या या रोमहर्षक लढतीत विंडीजला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ५ धावांची आवश्यकता होती. या चेंडूवर शाई होपने चौकार लगावत विंडीजचा पराभव टाळला. भारताने दिलेल्या ३२२ धावांचे आव्हान विंडीज पूर्ण करू शकले नाही, पण ३२१ धावा करत हा सामना बरोबरीत सोडवण्यात विंडीजला यश आले.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने आज वनडेत दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला. २०५ डावांमध्ये ही कामगिरी करत विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. धावांचे हे नवे शिखर गाठताना विराटने नाबाद १५७ धावांची खेळी केली.