मॅन्चेस्टरः यजमान इंग्लंड आणि भारत या दोन संघांमध्ये विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रंगेल, असे भाकित दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिस याने केले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर तो बोलत होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयी झाल्याबद्दल भारतीय संघाला आनंद झाला असेल. ऑस्ट्रेलियाला पराभवामुळे भारताचे गुणतालिकेतील स्थान अबाधित राहिले. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या क्रमांकावर राहिल्यामुळे ऑस्ट्रेलिया-इंग्लंड आणि भारत-न्यूझीलंड यांच्यात उपांत्यफेरीतील सामना होईल, असे तो म्हणाला.
गेल्या काही सामन्यातील न्यूझीलंडची कामगिरी खालावत गेल्याचे पाहायला मिळाली. त्यामुळे भारताला अंतिम फेरी गाठण्याची चांगली संधी आहे. तर दुसरीकडे इंग्लंड संघ चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये विश्वविजयासाठीचा सामना रंगेल, असे त्याने सांगितले.
गेल्या काही सामन्यातील न्यूझीलंडची कामगिरी खालावत गेल्याचे पाहायला मिळाली. त्यामुळे भारताला अंतिम फेरी गाठण्याची चांगली संधी आहे. तर दुसरीकडे इंग्लंड संघ चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे भारत आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये विश्वविजयासाठीचा सामना रंगेल, असे त्याने सांगितले.