अ‍ॅपशहर

रिषभ पंत टीम इंडियाचे भविष्य: विराट कोहली

टीम इंडियाने वेस्ट इंडीजला तिसऱ्या आणि अखेरच्या टी-ट्वेंटी सामन्यात ७ गडी राखून पराभूत करून तीन सामन्यांची मालिका ३-० अशा फरकाने खिशात घातली. कर्णधार विराट कोहली संघाच्या कामगिरीवर खूप खूश आहे. अखेरच्या लढतीत ६५ धावा करणारा युवा फलंदाज रिषभ पंतचं त्यानं भरभरून कौतुक केलं.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Aug 2019, 1:09 pm
गयाना: टीम इंडियाने वेस्ट इंडीजला तिसऱ्या आणि अखेरच्या टी-ट्वेंटी सामन्यात ७ गडी राखून पराभूत करून तीन सामन्यांची मालिका ३-० अशा फरकाने खिशात घातली. कर्णधार विराट कोहली संघाच्या कामगिरीवर खूप खूश आहे. अखेरच्या लढतीत ६५ धावा करणारा युवा फलंदाज रिषभ पंतचं त्यानं भरभरून कौतुक केलं. पंत हा टीम इंडियाचे भविष्य आहे, असं तो म्हणाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम virat-and-rishabh


रिषभ पंतनं अखेरच्या सामन्यात ६५ धावांची सुरेख खेळी केली. कर्णधार विराट कोहलीसह त्यानं तिसऱ्या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी रचून टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामन्यानंतर पंतच्या कामगिरीबाबत विचारलं असता, 'आम्ही पंतकडे टीम इंडियाचे भविष्य म्हणून पाहतो. त्याच्यात कमालीची क्षमता आणि प्रतिभा आहे. आपण त्याला वेळ द्यायला हवा. त्याच्यावर कोणताही दबाव ठेवायला नको,' असं विराट म्हणाला.

याआधीच्या दोन लढतींमध्ये पंत सपशेल अपयशी ठरला होता. दोन्ही सामन्यांत अनुक्रमे ० आणि ४ धावांवर बाद झाला होता. मात्र, तिसऱ्या सामन्यात त्यानं वापसी केली आणि स्वतःला सिद्ध केलं. वेस्ट इंडीजविरुद्धच्या अखेरच्या टी-२० सामन्यात त्यानं ४२ चेंडूंमध्ये ६५ धावा केल्या. या खेळीत त्याने चार चौकार आणि चार षटकार लगावले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज