अ‍ॅपशहर

तिसरा सामना रद्द; टी-२० मालिका बरोबरीत

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत संपली आहे. दरम्यान, पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने पाहुण्या ऑस्ट्रेलियाचा ४-१ असा धुव्वा उडवला होता.

Maharashtra Times 13 Oct 2017, 9:51 pm
मटा ऑनलाइन वृत्त । हैदराबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india aus 3rd t20i called off due to wet outfield
तिसरा सामना रद्द; टी-२० मालिका बरोबरीत


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत संपली आहे. दरम्यान, पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने पाहुण्या ऑस्ट्रेलियाचा ४-१ असा धुव्वा उडवला होता.

हैदराबादमध्ये मुसळधार पाऊस पडल्याने खेळपट्टीवर पाणी साचलं होतं. ग्राउंड स्टाफने मैदानावर साचलेलं पाणी काढण्यासाठी अथक मेहनत घेतली मात्र त्यानंतरही मैदान खेळण्यायोग्य होऊ शकलं नाही. पंचांनी दोनवेळा मैदानाची पाहणी केली व त्यानंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामन्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी होती. स्टेडियम खच्चून भरलं होतं. मात्र, सामना रद्द झाल्याने या प्रेक्षकांचा हिरमोड झाला.

दरम्यान, भारतापुढे येत्या २२ ऑक्टोबरपासून न्यूझीलंड संघाचे आव्हान असणार आहे. न्यूझीलंड संघ भारतात येत असून या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज