अ‍ॅपशहर

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेला पुण्यातून सुरुवात

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला पुढील वर्षी २३ फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. पुणे कसोटी ही मालिकेतील पहिली कसोटी असेल. या मालिकेसाठी भारतात येतात ऑस्ट्रेलियाची दमछाक होणार आहे; कारण २२ फेब्रुवारीपर्यंत हा संघ मायदेशात श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. तसे कांगारुंचे कसोटी, वनडे व टी-२० संघातील खेळाडू वेगळे असतात; पण काही खेळाडू क्रिकेटच्या तीनही प्रकारच्या संघांत असण्याची दाट शक्यता आहे.

Maharashtra Times 22 Oct 2016, 12:00 am
नवी दिल्लीः भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला पुढील वर्षी २३ फेब्रुवारीपासून सुरुवात होईल. पुणे कसोटी ही मालिकेतील पहिली कसोटी असेल. या मालिकेसाठी भारतात येतात ऑस्ट्रेलियाची दमछाक होणार आहे; कारण २२ फेब्रुवारीपर्यंत हा संघ मायदेशात श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. तसे कांगारुंचे कसोटी, वनडे व टी-२० संघातील खेळाडू वेगळे असतात; पण काही खेळाडू क्रिकेटच्या तीनही प्रकारच्या संघांत असण्याची दाट शक्यता आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india australia test series to start feb 23 in pune
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेला पुण्यातून सुरुवात


या मालिकेतील तीन कसोटी पुणे, रांची आणि धरमशाला येथे रंगणार आहेत. या मालिकेच्या निमित्ताने प्रथमच या ठिकाणी कसोटी सामन्यांचे आयोजन होते आहे.

२३ ते २७ फेब्रुवारीदरम्यान पुण्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना पार पडला की बेंगळुरूमध्ये ४ ते ८ फेब्रुवारीदरम्यान भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ४ ते ८ मार्चदरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यांचे आयोजन होईल. रांचीला १६ ते २० तर धरमशाला येथे २५ ते २९ मार्च दरम्यान कसोटींचे आयोजन होईल.

भारतात येण्याआधी ऑस्ट्रेलिया संघ मायदेशात १७ ते २२ फेब्रुवारीदरम्यान श्रीलंकेविरुद्ध टी-२०ची मालिका खेळणार आहे. गेल्या भारत दौऱ्यावर भारताने ऑस्ट्रेलियावर ४-० असे निर्भेळ यश मिळवले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज