मटा ऑनलाइन वृत्त । बेंगळुरू
'अपयश ही यशाची पहिली पायरी असते', हा वाक्प्रचार टीम इंडियानं तंतोतंत खरा करून दाखवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दारूण पराभव पत्करावा लागलेल्या टीम इंडियानं आज बेंगळुरूत विजयाचा झेंडा फडकवलाय. पहिल्या डावात पिछाडीवर पडलेली आणि दुसऱ्या डावातही मोठी आघाडी घेऊ न शकलेली विराटसेना पुन्हा एकदा 'माती खाणार' असं वाटत असतानाच, आर. अश्विन धावून आला आणि त्याच्या फिरकीनं सामन्याचं चित्रच फिरवून टाकलं. त्यामुळे चार सामन्यांच्या मालिकेत भारतानं मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
टीम इंडियाचा दुसरा डाव आज २७४ धावांवर आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी १८८ धावांचं आव्हान होतं. ते सोपं नव्हतं, पण कठीणही नव्हतं. जवळपास पावणे दोन दिवसांचा खेळ शिल्लक असल्यानं स्मिथ कंपनीचंच पारडं जड वाटत होतं. भारताची मदार अश्विन-जाडेजा जोडीवर होती. त्यांची फिरकी संघाला तारेल, अशी आशा क्रिकेटप्रेमींना होती. त्यांना 'जादुगार' अश्विननं अजिबात निराश केलं नाही. त्यानं ४१ धावांत सहा जणांना तंबूचा रस्ता दाखवला आणि ११२ धावांवरच ऑस्ट्रेलियाचा खुर्दा पडला. भारतानं ७५ धावांनी नाट्यमय विजयाची नोंद केली. कांगारूंच्या शेवटच्या सहा विकेट्स तर अवघ्या ११ धावांत गेल्या.
पहिल्या डावात ९० धावांची जिगरबाज खेळी करणारा के. एल. राहुल 'मॅन ऑफ द मॅच' ठरला.
भारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटीचं संपूर्ण स्कोअरकार्ड
क्षण आला विजयाचा...
Jai Hind #TeamIndia #INDvAUS 😀 pic.twitter.com/fNjxERrqQV — BCCI (@BCCI) March 7, 2017
Chak de India!! #INDvAUS pic.twitter.com/XjIyzVKvEh — sachin tendulkar (@sachin_rt) March 7, 2017
'अपयश ही यशाची पहिली पायरी असते', हा वाक्प्रचार टीम इंडियानं तंतोतंत खरा करून दाखवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत दारूण पराभव पत्करावा लागलेल्या टीम इंडियानं आज बेंगळुरूत विजयाचा झेंडा फडकवलाय. पहिल्या डावात पिछाडीवर पडलेली आणि दुसऱ्या डावातही मोठी आघाडी घेऊ न शकलेली विराटसेना पुन्हा एकदा 'माती खाणार' असं वाटत असतानाच, आर. अश्विन धावून आला आणि त्याच्या फिरकीनं सामन्याचं चित्रच फिरवून टाकलं. त्यामुळे चार सामन्यांच्या मालिकेत भारतानं मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.
टीम इंडियाचा दुसरा डाव आज २७४ धावांवर आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी १८८ धावांचं आव्हान होतं. ते सोपं नव्हतं, पण कठीणही नव्हतं. जवळपास पावणे दोन दिवसांचा खेळ शिल्लक असल्यानं स्मिथ कंपनीचंच पारडं जड वाटत होतं. भारताची मदार अश्विन-जाडेजा जोडीवर होती. त्यांची फिरकी संघाला तारेल, अशी आशा क्रिकेटप्रेमींना होती. त्यांना 'जादुगार' अश्विननं अजिबात निराश केलं नाही. त्यानं ४१ धावांत सहा जणांना तंबूचा रस्ता दाखवला आणि ११२ धावांवरच ऑस्ट्रेलियाचा खुर्दा पडला. भारतानं ७५ धावांनी नाट्यमय विजयाची नोंद केली. कांगारूंच्या शेवटच्या सहा विकेट्स तर अवघ्या ११ धावांत गेल्या.
पहिल्या डावात ९० धावांची जिगरबाज खेळी करणारा के. एल. राहुल 'मॅन ऑफ द मॅच' ठरला.
भारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटीचं संपूर्ण स्कोअरकार्ड
क्षण आला विजयाचा...
Jai Hind #TeamIndia #INDvAUS 😀 pic.twitter.com/fNjxERrqQV — BCCI (@BCCI) March 7, 2017
Chak de India!! #INDvAUS pic.twitter.com/XjIyzVKvEh — sachin tendulkar (@sachin_rt) March 7, 2017