वृत्तसंस्था, नागपूर
भारताच्या युवा संघाने १९ वर्षांखालील गटाच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या लढतीत इंग्लंडला दुसऱ्या डावात १६७ धावांत रोखले खरे; पण २३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची ६ बाद ६१ अशी स्थिती झाली होती. सुरेश लोकेश्वरने चिवट लढा देऊन इंग्लंडविरुद्धची कसोटी अनिर्णित राखली. भारताने दुसऱ्या डावात ८ बाद १८९ धावा केल्या. यात लोकेश्वरने १२५ चेंडूंत १४ चौकारांसह नाबाद ९२ धावांची खेळी केली.
जामठाच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर ही चारदिवसीय लढत झाली. इंग्लंडने पहिला डाव ५ बाद ५०१ धावांवर घोषित केला होता. यानंतर भारताने पहिला डाव ८ बाद ४३१ धावांवरच घोषित केला. या वेळी इंग्लंडकडे ७० धावांची आघाडी मिळाली. लढतीच्या चौथ्या आणि अखेरच्या दिवशी गोलंदाजांना खेळपट्टीकडून चांगली मदत मिळाली. गुरुवारी या लढतीत १७ फलंदाज बाद झाले. इंग्लंडचीही दुसऱ्या डावात ३ बाद ४८ अशी स्थिती होती. मधल्या फळीतील जॉर्ज बार्टलेटने ९७ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारसह ६८ धावा केल्या. बार्टलेट बाद झाल्यानंतर सिजोमन जोसेफने इंग्लंडला १६७ धावांत रोखले. फिरकी गोलंदाज जोसेफने डावात ६ बळी घेण्याची किमया केली.
भारताला २३८ धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र, इंग्लंडच्या गोलंदाजांनीही अचूक मारा केला. त्यामुळे अभिषेक गोस्वामी (४), रोहन कुन्नूमल (४), आरआय ठाकूर (८), जाँटी सिधू (१), सौरभ सिंग (५) हे झटपट माघारी परतले. भारताचा निम्मा संघ ४८ धावांत माघारी परतला होता. पहिल्या डावातील शतकवीर डेरल फेरारियोने ३१ चेंडूंत ७ चौकारांसह ३७ धावा जोडल्या. यानंतर लोकेश्वरने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत भारताचा पराभव टाळला.
स्कोअरबोर्ड: इंग्लंड ५ बाद ५०१ डाव सोडला आणि ५३ षटकांत १६७ (जॉर्ज बार्टलेट ६८, हॅरी ब्रूक २९, ओली पोपे २६, सिजोमन जोसेफ ६-६२, फेरारिओ २-१७) अनिर्णित वि. भारत ८ बाद ४३१ डाव सोडला आणि ४९ षटकांत ८ बाद १८९ (सुरेश लोकेश्वर नाबाद ९२, डॅरेल फेरारियो ३७, कनिष्क सेठ १८, जोसेफ १२, ब्रूक्स ३-५६, अॅरन बिअर्ड २-२४).
भारताच्या युवा संघाने १९ वर्षांखालील गटाच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील पहिल्या लढतीत इंग्लंडला दुसऱ्या डावात १६७ धावांत रोखले खरे; पण २३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची ६ बाद ६१ अशी स्थिती झाली होती. सुरेश लोकेश्वरने चिवट लढा देऊन इंग्लंडविरुद्धची कसोटी अनिर्णित राखली. भारताने दुसऱ्या डावात ८ बाद १८९ धावा केल्या. यात लोकेश्वरने १२५ चेंडूंत १४ चौकारांसह नाबाद ९२ धावांची खेळी केली.
जामठाच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर ही चारदिवसीय लढत झाली. इंग्लंडने पहिला डाव ५ बाद ५०१ धावांवर घोषित केला होता. यानंतर भारताने पहिला डाव ८ बाद ४३१ धावांवरच घोषित केला. या वेळी इंग्लंडकडे ७० धावांची आघाडी मिळाली. लढतीच्या चौथ्या आणि अखेरच्या दिवशी गोलंदाजांना खेळपट्टीकडून चांगली मदत मिळाली. गुरुवारी या लढतीत १७ फलंदाज बाद झाले. इंग्लंडचीही दुसऱ्या डावात ३ बाद ४८ अशी स्थिती होती. मधल्या फळीतील जॉर्ज बार्टलेटने ९७ चेंडूंत ११ चौकार व १ षटकारसह ६८ धावा केल्या. बार्टलेट बाद झाल्यानंतर सिजोमन जोसेफने इंग्लंडला १६७ धावांत रोखले. फिरकी गोलंदाज जोसेफने डावात ६ बळी घेण्याची किमया केली.
भारताला २३८ धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र, इंग्लंडच्या गोलंदाजांनीही अचूक मारा केला. त्यामुळे अभिषेक गोस्वामी (४), रोहन कुन्नूमल (४), आरआय ठाकूर (८), जाँटी सिधू (१), सौरभ सिंग (५) हे झटपट माघारी परतले. भारताचा निम्मा संघ ४८ धावांत माघारी परतला होता. पहिल्या डावातील शतकवीर डेरल फेरारियोने ३१ चेंडूंत ७ चौकारांसह ३७ धावा जोडल्या. यानंतर लोकेश्वरने तळाच्या फलंदाजांना साथीला घेत भारताचा पराभव टाळला.
स्कोअरबोर्ड: इंग्लंड ५ बाद ५०१ डाव सोडला आणि ५३ षटकांत १६७ (जॉर्ज बार्टलेट ६८, हॅरी ब्रूक २९, ओली पोपे २६, सिजोमन जोसेफ ६-६२, फेरारिओ २-१७) अनिर्णित वि. भारत ८ बाद ४३१ डाव सोडला आणि ४९ षटकांत ८ बाद १८९ (सुरेश लोकेश्वर नाबाद ९२, डॅरेल फेरारियो ३७, कनिष्क सेठ १८, जोसेफ १२, ब्रूक्स ३-५६, अॅरन बिअर्ड २-२४).